शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

डिझेलच्या दरातून महागाईचा कृत्रिम आलेख

By admin | Updated: December 16, 2015 23:08 IST

अहमदनगर : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरतात़ डिझेलचे दर वाढल्यानंतर सर्वच वस्तुंची तत्काळ दरवाढ होते़

अहमदनगर : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरतात़ डिझेलचे दर वाढल्यानंतर सर्वच वस्तुंची तत्काळ दरवाढ होते़ मात्र, हेच दर कमी झाले तर वाढलेले दर ‘जैसे थे’च राहतात़ यातूनच महागाईचा कृत्रिम आलेख वाढत जातो़ पेट्रोल-डिझेलच्या दरानुसार इतर वस्तुंचे दर कसे असावेत, याबाबत कुठलेही धोरण नाही़ तसेच यावर शासनाचेही काहीच नियंत्रण नसल्याने डिझेल दरवाढीतून निर्माण होणाऱ्या महागाईचा थेट सर्वसामान्य ग्राहकांनाच फटका बसत असल्याचे मत ‘लोेकमत परिचर्चे’त व्यक्त झाले़ वर्षाच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात झाली़ गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा ही दर कपात झाली़ याआधी नोव्हेंबरमध्ये डिझेलच्या दरात ८९ पैशांनी वाढ करण्यात आली होती़ या दरवाढीचा आणि कपातीचा एकूण बाजारपेठेवर काय परिणाम होतो, या अनुषंगाने ‘डिझेलची दरवाढ, महागाई आणि सर्वसामान्य ग्राहक’ या विषयावर बुधवारी ‘लोकमत परिचर्चे’चे आयोजन करण्यात आले होते़ या चर्चेत ग्राहक संघाचे अध्यक्ष शिरिष बापट, जिल्हा मोटारमालक कल्याणकारी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सानप, महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा व परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक प्रमोद नेहूल सहभागी झाले होते़ आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचितशी दर कपात झाली़ पेट्रोलचे दर प्रतिलीटर ५० पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ४६ पैशांची कपात केली गेली. नवीन दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाले़ या दर कपातीमुळे नगरमध्ये पेट्रोल ६७़३१ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ४९़९७ रुपये दराने मिळणार आहे़ डिझेलचे दर वाढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून येते़ अगदी भाजीपाल्यापासून ते रिक्षा भाडे, किराणा माल, कपडे यासह सर्वच वस्तुंची दरवाढ केली जाते़ मात्र, डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर हे वाढलेले दर ‘जैसे थे’च राहतात़ यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांचा आर्थिक तोटा होतो़ भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने वस्तुंची दरनिश्चिती असली तरी व्यापारी ठरवतील तोच दर ग्राहकांना द्यावा लागतो़ यावर मात्र, नियंत्रण ठेवणारी कुठलीही व्यवस्था कार्यरत नसल्याचे मत सहभागींनी व्यक्त केले़ पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा बाजारपेठेत तत्काळ परिणाम होतो़ दरवाढीचे कारण दाखवित प्रत्येक वस्तुची व्यापाऱ्यांकडून दरवाढ केली जाते़ डिझेलमध्ये दर कपात झाल्यानंतर मात्र, वस्तुंंचे वाढलेले दर कमी केले जात नाहीत़ भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने किरकोळ बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तुंची किंमत विकणाराच निश्चित करतो़ यातून कृत्रिम महागाई वाढते़ या महागाईवर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था स्थानिक पातळीवर कार्यान्वित करणे गरजेचे आहे़ -शिरिष बापट, अध्यक्ष जिल्हा ग्राहक संघ. डिझेलचे दर वाढले किंवा कमी झाले तर मोठ्या क्षेत्रात दर कमी-जास्त होतात़ किरकोळ बाजारात मात्र, दर वाढतात, कमी होत नाहीत़ किरकोळ बाजारातील खरेदीदार हा सर्वसामान्य ग्राहक असल्याने या वाढत्या महागाईचा थेट या वर्गाला फटका बसतो़ काही बाबतीत शासनाने कडक नियम करणे गरजेचे आहे़ डिझेल दरवाढीनंतर रिक्षांचे भाडे वाढविले जाते़ यावर आरटीओ विभागाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे़ तसेच याबाबत शासनाने धोरण निश्चित करणे गरजेचे आहे़ - हरजितसिंग वधवा, अध्यक्ष, महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशन. डिझेलची दरवाढ झाली तर वाहतुकीचे वाढतात, डिझेल दर कमी झाले तर वाहतुकीचे दर कमी होतात. यावेळी ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या वस्तुंचेही दर कमी होणे अपेक्षित असते़ प्रत्यक्षात मात्र, व्यापारी आणि दलाल हे दर कमी होऊ देत नाहीत़ याचा वाहतूकदारांसह ग्राहकांनाही तोटा होतो़ तसेच शासनाने विविध मालाच्या वाहतुकीनुसार कर निश्चित केलेले आहेत़ बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तुंबाबत मात्र, काहीच नियंत्रण नाही़ यातून महागाई वाढत जाते़ - बाबासाहेब सानप, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मोटारमालक कल्याणकारी समिती. डिझेलची दरवाढ किंवा कपात झाल्यानंतर एसटीच्या प्रवास भाड्याचे जे काही दर वाढतात किंवा कमी होतात़ याबाबत थेट शासनपातळीवरुन निर्णय घेतले जातात़ मागील दोन ते तीन वर्षात प्रवासभाड्यामध्ये ५ ते ६ टक्यांनी दरवाढ झालेली आहे़ कपात झालेली नाही़ -प्रमोद नेहूल, आगार व्यवस्थापक.