शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सभापती पदासाठी सेना- काँग्रेसमध्ये रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST

अहमदनगर : महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सभापतीपद सेना, तर ...

अहमदनगर : महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सभापतीपद सेना, तर उपसभापती पद काँग्रेसला देण्याबाबत चर्चा सुरू असून, महिला व बालकल्याण समितीच्या पुढच्या सभापती कोण, याचीच उत्सुकता आहे.

महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सर्वसाधारण सभा झाली. महिला व बाल कल्याण समिती विसर्जित करण्याचा विषय सभेसमोर होता. सभेला आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी महिला व बाल कल्याण समितीचे विसर्जन करण्यास मान्यता देण्याची सूचना मांडली. त्यानुसार महापौर शेंडगे यांनी महिला व बालकल्याण समिती विसर्जित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावरून सभापती लता शेळके व उपसभापती सुवर्णा गेणप्पा यांच्यासह १६ सदस्यांची महिला व बालकल्याण समिती बरखास्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा सर्वसाधारण सभा बोलविली जाईल. सभा घेऊन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यानंतर सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे.

राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. नगर महापालिकेत सेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला महापालिकेत एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेसला महिला व बालकल्याण समिती देण्याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, सेनेकडून सभापती पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. सेनेला सभापती व उपसभापतीपद काँग्रेसला देण्याची चर्चा सुरू असून, काँग्रेसकडून रुपाली निखिल वारे व संध्या बाळासाहेब पवार यांची नावे चर्चेत आहेत. सेनेने सभापती पद घेतल्यास काँग्रेसला उपसभापती पदावर समाधान मानावे लागणार आहे.

.....

महिला व बालकल्याणला ५ टक्के निधी

महापालिकेच्या अंदाजपत्रकातील ५ टक्के रक्कम महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव असते. तसेच जिल्हा नियोजन समितीचा ५ टक्के निधी या समितीसाठी राखीव असतो. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून विकासकामे करणे शक्य आहे. तत्कालीन सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांच्या कार्यकाळात शहरातील उद्यानांमध्ये खेळणी बसविण्याचे मोठे काम झाले. तसेच अन्य विकासकामेही शिंदे यांनी समितीच्या माध्यमातून पूर्ण केली.