शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

विमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक, तक्रारीसाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

अहमदनगर : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून ...

अहमदनगर : अतिवृष्टीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असेल तर ७२ तासांच्या आत ॲपवर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून आता यासाठी सहा विविध पर्याय तक्रार करण्यासाठी देण्यात आले आहेत.

मागील पंधरा दिवसांपूर्वी अतिवृष्टीने शेवगाव, पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासह जनावरांचा चारा, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र तक्रार ७२ तासांच्या आत करण्यासाठी दोनच पर्याय देण्यात आले होते. ऑफलाईन पद्धतीनेही पीक नुकसानीची तक्रार स्वीकारली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. आता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन लेखी तक्रार नोंदविता येणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे एकूण किती नुकसान झाले याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांच्याशी संर्पक केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच महसूल प्रशासनाकडेही अद्याप याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

-----

आदी हे होते दोनच पर्याय...

१) शेतकऱ्यांना विमा कंपनीचे ॲप डाऊनलोड करून त्यावरून पूर्ण माहिती भरून तक्रार करावी लागत होती. हा पर्यायही आता खुला असणार आहे.

२) टोल फ्री क्रमांक हा दुसरा पर्याय होता. मात्र फोन उचलला जात नसल्यामुळे यावर पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करा लागत होता.

----

हे आहेत पर्याय..

१) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कृषी कार्यालयात करावेत.

२) शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज काढले आहे त्या बँकेतही पीक नुकसानीसंदर्भात अर्ज करता येतो.

३) पीक विमा कंपनीच्या तक्रार कार्यालयातही तक्रार करता येते.

४) त्याचबरोबर पीक विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.

५) पीक विमा कंपनीच्या ई-मेलवरही तक्रार नोंदविता येणार आहे.

६) पीक विमा कंपनीच्या अधिकृत ॲपवरही शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येते.

----

अतिवृष्टीचे पंचनामे सुरूच..

१) शेवगाव, पाथर्डी तालुक्यात अतिवृृष्टीमुळे बाधित क्षेत्र अधिक आहे. तसेच जिल्ह्यातील इतर भागातही बाधित क्षेत्राचे जिल्हा प्रशासन, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत.

२) नुकसान क्षेत्राचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती आहे हे लक्षात येणार आहे.

३) निकष न लावता सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

-----

१५ कपाशी

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात अतिवृष्टीने कपाशीचे झालेले नुकसान.