शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडली जनावरे : शेतकरी संघटनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 19:47 IST

दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.

अहमदनगर : दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.भुमिपूत्र शेतकरी संघटना व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शेतीमालाला व दूधाला हमीभाव मिळत नसल्याने भाकड जनावरे सांभाळणे कठिण होत आहे. राज्यातील शेतक-यांना उत्पादक खर्चाशी निगडीत दुधाला प्रति लिटर २७ रूपये भाव मिळणे गरजेचे असताना केवळ १७ रूपयांचा भाव मिळतो. दूध संकलन करणारे संघ किंवा कंपन्या भेसळ करुन एका टँकरचे तीन टँकर करुन ग्राहकांना विकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यातून राज्यात दूध माफिया तयार झाले आहेत. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणा-या दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेसळयुक्त दुधाने त्यांच्या प्रतिकात्मक दगडाची तुला यावेळी करण्यात आली. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी होवून, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले.आंदोलनात भुमिपूत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, पीपल्स हेल्पलाईनचे अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, राज्य प्रवक्ते अनिल देठे, संतोष कोरडे, रोहन आंधळे, संतोष हंडे, दिलीप कोकाटे, संजय भोर, गणेश सुपेकर, निलेश औटी, सुनीता चव्हाण, सुनील खोडदे, निलेश तळेकर, विश्वनाथ औताडे, सचिन ईरोळे, मंजाबापू वाडेकर, व्ही. के. खाडे, काशिनाथ गोके, निलेश भोर, बाळासाहेब दरेकर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.नगर तहसीलवरही आंदोलनप्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने नगर तहसील कार्यालयावरही हे आंदोलन करण्यात आले. शेतक-यांनी यावेळी भाकड जनावरे व म्हातारे बैल आणले होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे, कार्याध्यक्ष विनोदसिंग परदेशी, भाऊसाहेब मोढवे, विजय मस्के, बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पद्धतशीरपणे शेतकºयांचे आंदोलन दडपले. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असे बारस्कर महाराज म्हणाले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय