शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडली जनावरे : शेतकरी संघटनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 19:47 IST

दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.

अहमदनगर : दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.भुमिपूत्र शेतकरी संघटना व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शेतीमालाला व दूधाला हमीभाव मिळत नसल्याने भाकड जनावरे सांभाळणे कठिण होत आहे. राज्यातील शेतक-यांना उत्पादक खर्चाशी निगडीत दुधाला प्रति लिटर २७ रूपये भाव मिळणे गरजेचे असताना केवळ १७ रूपयांचा भाव मिळतो. दूध संकलन करणारे संघ किंवा कंपन्या भेसळ करुन एका टँकरचे तीन टँकर करुन ग्राहकांना विकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यातून राज्यात दूध माफिया तयार झाले आहेत. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणा-या दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेसळयुक्त दुधाने त्यांच्या प्रतिकात्मक दगडाची तुला यावेळी करण्यात आली. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी होवून, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले.आंदोलनात भुमिपूत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, पीपल्स हेल्पलाईनचे अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, राज्य प्रवक्ते अनिल देठे, संतोष कोरडे, रोहन आंधळे, संतोष हंडे, दिलीप कोकाटे, संजय भोर, गणेश सुपेकर, निलेश औटी, सुनीता चव्हाण, सुनील खोडदे, निलेश तळेकर, विश्वनाथ औताडे, सचिन ईरोळे, मंजाबापू वाडेकर, व्ही. के. खाडे, काशिनाथ गोके, निलेश भोर, बाळासाहेब दरेकर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.नगर तहसीलवरही आंदोलनप्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने नगर तहसील कार्यालयावरही हे आंदोलन करण्यात आले. शेतक-यांनी यावेळी भाकड जनावरे व म्हातारे बैल आणले होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे, कार्याध्यक्ष विनोदसिंग परदेशी, भाऊसाहेब मोढवे, विजय मस्के, बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पद्धतशीरपणे शेतकºयांचे आंदोलन दडपले. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असे बारस्कर महाराज म्हणाले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय