शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आदिवासींची डांगी जनावरांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:49 IST

अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेक आदिवासी शेतकरी डांगीचे तांड्याने संगोपन व देखभाल करीत आहेत.

राजूर : अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेक आदिवासी शेतकरी डांगीचे तांड्याने संगोपन व देखभाल करीत आहेत.मागील दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाने केलेल्या सर्वेनुसार तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेने डांगी जनावरांची संख्या कमी झालेली आहे. संकरित गायी दूध अधिक देत असल्याने अधिकाधिक शेतकरी या गायींनाच पसंती देत आहेत. असे असले तरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अनेक आदिवासी शेतकरी आपल्या पूर्व परंपरेने तांड्याने डांगी गायींचेच संगोपन करीत आहेत.याबाबत भंडारदरा परिसरात गायी चारणारा शेतकरी गंगाराम झडे यांच्याशी सवांद साधला. यावेळी ते म्हणाले, डांगी गायी दुधाला कमी असतात. ही जात गावरान जनावरांत मोडते. यातील खरे उत्पन्न म्हणजे गोºह्यांचे असते. गायीला गोºहा झाल्यास शेतकरी गायीचे सर्व दूध त्यालाच देत असतात. याबरोबरच कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त पन्नास लहान मोठी जनावरे असल्याने शेणही भरपूर मिळते. एव्हढेच काय ते उत्पन्न.वाडवडिलांपासून गायींचा कळप आहे तो सांभाळला पाहिजे. गाय लक्ष्मी आहे. फायदा तोटा याचा विचार कधीच केला नसल्याचे झडे आत्मविश्वासाने सांगत होते. भंडारदरा धरणाच्या लगतचा परिसरातही आता पाण्याबरोबर चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी पावसाळ्यात अचानक पाऊस गेला. भाताचे पीक तर हातचे गेले. भाताचा पेंढाही त्यामुळे कमी झाला. आमच्या जनावरांना भाताचा पेंढा हा मुख्य चारा असतो.आता तोही कमी पडत चालला असल्याने खुरटलेला चारा चारण्याची वेळ आली असल्याची खंत माळरानावर गायी चारणारे चिंधू खाडे या शेतकºयाने सांगितले.शेतकऱ्यांना फायदाचारा आणि पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही आजही भंडारदरा, बारी, रतनवाडी, कोलटेंबे, मुतखेल आदी आदिवासी गावांमध्ये अनेक आदिवासी शेतकरी किमान तीस ते अधिक गायींचे कळप राखत गोधन जपत आहेत. गावठी गायींचे शेण,गोमूत्र आदींचा आयुर्वेदाच्या दृष्टीने होणाºया फायद्यांची कल्पना या शेतकºयांना मिळाल्यास त्यांचे उत्पन्नाचे साधन वाढेल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले