शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

माती आरोग्य सुधारले तरच पर्यावरण वाचेल-अनिल दुर्गुडे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:43 IST

२००२ मध्ये आंतरराष्ट्रीय युनियन मृदशास्त्र या संस्थेने थायलंडचे राजे एच़ एम़ भुमीबोल आदल्यादेज यांच्या पुढाकाराने त्यांचा जन्मदिवस ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. डिसेंबर २०१३ रोजी युनायटेड नेशन जनरल असेम्ब्लीत ठराव करण्यात आला. मृदा दिनानिमित्त राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा शास्त्रज्ञ डॉ़अनिल दुरगुडे यांच्याशी केलेला संवाद...

जागतिक मृदा दिन विशेषलोकमत मुलाखत - भाऊसाहेब येवले/  राहुरी : मातीचे बिघडलेले आरोग्य सुधारले तर पर्यावरण सुरक्षित राहील. त्या दृष्टिकोनातून २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय युनियन मृदशास्त्र या संस्थेने थायलंडचे राजे एच़ एम़ भुमीबोल आदल्यादेज यांच्या पुढाकाराने त्यांचा जन्मदिवस ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. डिसेंबर २०१३ रोजी युनायटेड नेशन जनरल असेम्ब्लीत ठराव करण्यात आला. मृदा दिनानिमित्त राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा शास्त्रज्ञ डॉ़अनिल दुरगुडे यांच्याशी केलेला संवाद...प्रश्न : जमिनीचे आरोग्य कसे धोक्यात आले आहे ? डॉ. दुरगुडे : नैसर्गिक संशोधनामध्ये माती ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. देशात पाण्याव्दारे मातीची प्रति हेक्टरी १६ टन धूप होत आहे. वर्षाला ५़३ बिलीयन  टन माती वाहून जाते़ त्याबरोबर ८ मिलियन टन अन्नद्रव्य वाहून जात़े. जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुस-या बाजूला नदी व कॅनलच्या कडेला असलेल्या जमिनी खराब झाल्या आहेत. भारतात ७ मिलियन हेक्टर जमिनी क्षारपड झाल्या आहेत. धोक्यात आलेली मृदा वाचविण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रश्न : जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षणाचे महत्व काय आहे?डॉ़दुरगुडे : जमिनीचा कर्ब घसरल्याने ६५ टक्के उत्पादकता कमी झाली आहे. शेतक-यांनी माती तपासून घ्यावी. त्यानुसार खतांची मात्रा द्यावी. माती परीक्षणानुसार पाणी देण्याचे नियोजन करावे. आरोग्य पत्रिकेनुसार नियोजन केले तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पिकांची फेरपालट करावी़ ताग व धैंचासारख्या हिरवळीची खते करून ते जमिनीत गाडावे. त्यामुळे जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होईल.प्रश्न : जमिनीची धूप थांबविण्यासाठी काय करता येईल ? डॉ.दुरगुडे : जमिनीची बांधबंदिस्ती, सपाटीकरण, मृदा व जल संधारणाचा वापर केल्यामुळे मातीची धूप कमी होईल. जलसाठ्यामध्ये वाढ होईल. मातीचा सामू ६़५ ते ७़५ इतका असावा. जसजसा जमिनीचा सामू वाढत जाईल. तसतसे जमिनीत टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होत जाते. माती परीक्षणानुसार जिप्सम हे शेणखतामध्ये मिसळून टाकावे.प्रश्न : उसामुळे जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत़. त्याबद्दल काय करता येईल?डॉ. दुरगुडे : बागायती नदी व कॅनलच्या परिसरात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ऊस हे पीक ठिबकखाली घेतल्यास पाण्याची बचत होईल व जमिनीचा पोत सुधारून उत्पादकता वाढेल़.प्रश्न : फळबागासंदर्भात काय करता येईल ? डॉ. दुरगुडे : फळबागासाठी सेंद्रीय पिकांचा व प्लॅस्टीक मल्चींगचा वापर करावा. तणाला फुले येण्यापूर्वीच उपटून झाडांच्या बुंध्याभोवती मल्चींग म्हणून टाकाव्यात़. याशिवाय जिवाणू खतांचा वापर करावा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.