शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

अमृत भुयारी गटार योजना शहर अभियंत्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST

अहमदनगर : शासकीय योजना पूर्ण होईपर्यंत एकाच अधिकाऱ्याकडे असते. महापालिकेने मात्र गेल्या तीन वर्षात तीन अधिकारी बदलले असून, अमृत ...

अहमदनगर : शासकीय योजना पूर्ण होईपर्यंत एकाच अधिकाऱ्याकडे असते. महापालिकेने मात्र गेल्या तीन वर्षात तीन अधिकारी बदलले असून, अमृत भुयारी गटार योजनेची जबाबदारी आता शहर अभियंता सुरेश इथापे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

महापालिकेची अमृत भुयारी गटार योजना पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित होती. तत्कालीन पाणीपुरवठा विभागप्रमुख महादेव काकडे यांच्याकडे सदर योजनेची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. ते सेवानिवृत्त झाल्याने पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांच्याकडे ही योजना सोपविण्यात आली. त्यांच्याकडून ही योजना आयुक्त शंकर गोरे यांनी काढून घेतली असून, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्याकडे सोपविली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने योजनेचे काम थांबविण्यात आले आहे. हे काम ड्रिम कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. सदर संस्थेने मध्यवर्ती शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाइप टाकले. परंतु, रस्ते पुन्हा दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे शहरातील ४०हून अधिक रस्त्यांची कामे रखडली असून, रस्त्यांची तात्पुरती दुरुस्तीही ठेकेदाराकडून केली नाही. पावसाळा सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने वेळोवेळी बजावूनही ठेकेदाराने रस्ते दुरुस्त केली नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ही योजना आता बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे.

.......

आयुक्त म्हणतात काम थांबविले

अमृत भुयारी गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. याबाबत नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठविला होता. त्यावर आयुक्त शंकर गोरे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, कारवाई न करता ठेकेदाराचे काम पावसाळा सुरू असल्याने थांबविले आहे, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले. परंतु, गेल्या सहा महिन्यांत खोदलेल्या रस्त्यांचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.