शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

टक्का घसरला तरीही मुलींनीच मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 23:45 IST

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेत गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेली घसरगुंडी यंदाही कायम राहिली़ २०१३ साली पुणे विभागात नगर अव्वल होता़

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेत गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेली घसरगुंडी यंदाही कायम राहिली़ २०१३ साली पुणे विभागात नगर अव्वल होता़ मात्र, त्यानंतर नगरचा निकाल सातत्याने ढासळत आहे़ मुलींनी या वर्षीही निकालात बाजी मारली असली तरी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलींमध्येही तीन टक्क्यांनी घसरले आहे़ तर एकूण निकाल ५ टक्क्यांनी घसरला आहे़नगर जिल्ह्यातील ३६८ विद्यालयांमधून ५७ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी या वर्षी परीक्षा दिली़ हे सर्व विद्यार्थी नियमित होते़ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्क्यांनी निकाल घसरला आहे़ मुलींनी बारावीतले अव्वल स्थान कायम राखले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही घसरले आहे़ गेल्या वर्षी ९५़७० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या़ तर या वर्षी हेच प्रमाण ९२़४६ टक्क्यापर्यंत घसरले आहे़ मागील वर्षी जिल्ह्यातील तब्बल ३५ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला होता़ यंदा १०० नंबरी विद्यालयांचे प्रमाणही दुपटीने कमी झाले आहे़ यंदा केवळ अठरा विद्यालयांचाच निकाल १०० टक्के लागला आहे़ २०१४ साली नगरचा बारावीचा निकाल ९३़२७ टक्के, २०१५ साली ९२़२७ टक्के तर या वर्षीचा निकाल ८७़१२ टक्के इतका लागला आहे़ गेल्या वर्षी सहा टक्के निकाल वाढला होता़ मात्र, यंदा त्यात पाच टक्क्यांची घसरण झाली आहे़ या वर्षी बारावीच्या परीक्षेत ८३़३६ टक्के मुले तर ९२़४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत़ मुले व मुलींमध्ये तब्बल दहा टक्क्यांचा फरक आहे़ विषयानुसारही मुलींनी टक्केवारीत बाजी मारली आहे़ मात्र, सलग तिसऱ्या वर्षीही विभागात नगरची घसरण कायम राहिल्याने शैक्षणिक वर्तुळात बुधवारी फारसे उत्साहपूर्ण वातावरण पहायला मिळाले नाही़सोशल मीडियाचा वापर करण्यामध्ये मुलींपेक्षा मुले आघाडीवर आहेत़ सतत मोबाईलमध्ये डोके अडकवून बसण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढीस लागली आहे़ सोशल मीडियाचा अतिरेकी वापर नकारात्मक मानसिकता तयार करतो़ त्यामुळे मुलांमधील टक्केवारी सातत्याने घसरत आहे़ गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाचा अतिरेकी वापर वाढल्यामुळे व पालकांचेही मुलांकडे लक्ष नसल्यामुळे यंदाचा निकाल निराशाजनक असल्याचा सूर जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात उमटला आहे़