शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

कुकडीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाईचीही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पाण्याचे समन्यायी वाटप होऊन हक्काचे पाणी मिळावे यासाठी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी एकत्र येण्यास सुरुवात ...

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पाण्याचे समन्यायी वाटप होऊन हक्काचे पाणी मिळावे यासाठी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी असल्याचे शेतकरी म्हणाले. रविवारी पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पहिली बैठक पारगाव सुद्रिक येथे पार पडली.

या बैठकीत कुकडीतील हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. कुकडी प्रकल्पावरील डाव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना दरवेळी हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे पारनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पारनेर येथील शेतकऱ्यांनी कुकडी संघर्ष समिती स्थापन केली. ही समिती विविध ठिकाणी बैठका घेत आहे.

कुकडीच्या समन्यायी पाणी वाटपासाठी या समितीकडून राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दावा दाखल करण्यात येणार आहे. या संघर्षात राजकारण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय नेतेविरहित संघर्ष उभा करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकरीच पुढाकार घेणार असून शेतकरी निधी उभारणार आहेत.

श्रीगाेंद्यात या लढ्यासाठी शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. यात कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी सहभागी आहेत.

या बैठकीला पारनेर येथील रामदास घावटे, सतीश रासकर, मंगेश सालके, गोरख सालके, विशाल सिन्नलकर आदी शेतकरी उपस्थित होते. बैठकीत दिनकर पंधरकर, मारुती भापकर, पुरुषोत्तम लगड, ॲड. समित बोरुडे, अरविंद कापसे आदी शेतकऱ्यांनी पाणीप्रश्नी भूमिका मांडली. राजेंद्र काकडे यांनी सूत्रसंचालन केले.