शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खंडकऱ्यांचे प्रलंबित जमीन वाटप लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST

श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाची ११४ प्रकरणे आता प्रलंबित राहिली आहेत. त्यामध्ये ५३ प्रकरणांमध्ये न्यायालयांत याचिका दाखल आहेत. दत्तनगर व ...

श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाची ११४ प्रकरणे आता प्रलंबित राहिली आहेत. त्यामध्ये ५३ प्रकरणांमध्ये न्यायालयांत याचिका दाखल आहेत. दत्तनगर व बेलापूर येथे प्रत्येकी ५० टक्के जमीन वाटपावर समाधानी नसलेले सुमारे १५ शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका केल्या आहेत. कौटुंबिक स्तरावर ३६ प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय प्रशासकीय पातळीवर तसेच भूमी अभिलेख स्तरावर १७ प्रकरणांवर अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. राहाता तालुक्यातील ६६ खंडकऱ्यांना अद्यापही जमिनीचे वाटप होऊ शकलेले नाही. तेथेही २७ वाद न्यायालयात पोहोचले आहेत.

शिर्डी, सावळीविहीर, निमगाव कोर्हाळे तसेच श्रीरामपुरातील दत्तनगर येथे खंडकऱ्यांना वाटपातील संपूर्ण जमिनी देण्यास प्रशासन तयार नाही. त्यातील ५० टक्के जमीन इतरत्र देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र शेतकरी त्याविरोधात न्यायालयात गेले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमीन वाटपाचा तिढा तीन महिन्यांमध्ये सोडविण्याची ग्वाही दिली.

---------

आमदार कानडे यांची मागणी

हरेगाव येथे शेती महामंडळाच्या वाड्यांवर शेकडो कामगार ५० वर्षांपासून राहत आहेत. मात्र अद्यापही तेथील निवासी जागा त्यांच्या नावावर होऊ शकलेली नाही. शहरालगत गायकवाड वस्ती येथेही तसाच प्रश्न आहे. सरकारच्या सर्वांना घरे देण्याच्या योजनेला त्यामुळे खीळ बसलेली आहे. घरकुलांचे प्रस्ताव मंजूर असूनही जागेच्या मालकीअभावी अंमलबजावणी होत नाही, अशी खंत आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केली व तोडगा काढण्याचे आवाहन केले.

--------