शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

गोर-गरिब शेतकºयांचे दु:ख दूर करण्यासाठी स्व. विखे यांचा देह सत्कारणी - पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:04 IST

अहमदनगर : गोर-गरीब, शेतकºयांचे दु:ख जाणने, त्यांचे दु:ख दूर करणे हेच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन होते. याचसाठी त्यांनी आपला देह सत्कारणी लावला, असे गौरवोद्वगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अहमदनगर : गोर-गरीब, शेतकºयांचे दु:ख जाणने, त्यांचे दु:ख दूर करणे हेच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन होते. याचसाठी त्यांनी आपला देह सत्कारणी लावला, असे गौरवोद्वगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

स्व. विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे व्हॅर्च्युअल प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.  स्व. विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, शेतकरी, सामान्यांचे जीवन सोपे करणे हे स्व. विखे पाटील यांचा जीवनाचा मंत्र ठरला. समाजासाठीच राजकारण व सत्ता हे मी कायम संभाळले. राजकारण करताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठीच त्यांचाभर राहिला. सत्ता व राजकारणाचा उपयोग त्यांनी सामान्यांच्या उद्धारासाठीच केला. 

 गाव आणि गरिबांच्या समस्यांचे समाधान कसे होईल, हाच त्यांचा विचार होता. गाव, गरीबांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, महाराष्ट्रातील सहकाराचा विकास करण्यासाठी त्यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. युवापिढीसाठी त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. गाव,गरिब आणि शेतकºयांचे दु:ख त्यांनी जवळून पाहिले. त्यांना सरकारशी जोडले, हे विखे पाटलांचे प्रयत्न राहिले. अनेक गावांचा चेहरामोहरा त्यांनीबदलला.सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्या जातीची किंवा धर्माची नाही. आतापर्यंत सगळ््या समाजाला प्रतिनिधीत्त्व दिले आहे. हाच सहकाराचा विचार त्यांनी मांडला. सहकारात सर्व वर्गाचे प्रतिनिधीत्त्व होते. सर्वांच्या कल्याणाचा सहकार हा मार्ग राहिला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी संपूर्ण देशात सहकाराचा विकास करण्यासाठी प्रचार केला. ग्रंथाचे शिर्षक हे प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराज यांच्या या पंक्तीमध्ये स्व. विखे पाटील यांच्या कार्याचे सार आहे.

प्रवरा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना शिक्षण, कौशल्याच्या विकासाचा मार्ग दिला. युवकांना प्रेरणा दिली. म्हणूनच प्रवरा संस्थेला स्व. बाळासाहेब यांचे नाव सार्थ आहे. गावामध्ये शेती आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.  व्यक्ती कितीही मोठा असला तरी शेतीचे कौशल्य नसेल तर तो काहीही करू शकत नाही.

शेती ही निसर्गाधारीत, असावे. हेच त्यांनी सांगितले. शेतीच्या प्रगतीसाठी जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा मेळ घालून प्रगती करण्याची गरज आहे. कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रगतीसाठी प्रोत्साहन देत आहे. हा पैसा शेतकºयांच्याच खिशात येईल.  पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी काम केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNarendra Modiनरेंद्र मोदी