शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व बाजार समित्या आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST

जिल्ह्यात कोरोबाधिताची संख्या वाढत असल्याने व दैनंदिन रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा आपत्ती ...

जिल्ह्यात कोरोबाधिताची संख्या वाढत असल्याने व दैनंदिन रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सोमवारी बैठक घेतली. तसेच यात जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढते रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता आणि कोरोनाची साखळी तोडणेकरिता जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याबाबत उपस्थितांचे एकमत झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार १८ मे च्या रात्री बारा वाजल्यापासून ते ३१ मे चा रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

----

पर्यायी व्यवस्था बाजार समितीकडे

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहणार आहे. तसेच समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांची राहणार आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व साथरोग अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.