शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सर्व बाजार समित्या आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST

जिल्ह्यात कोरोबाधिताची संख्या वाढत असल्याने व दैनंदिन रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा आपत्ती ...

जिल्ह्यात कोरोबाधिताची संख्या वाढत असल्याने व दैनंदिन रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सोमवारी बैठक घेतली. तसेच यात जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढते रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता आणि कोरोनाची साखळी तोडणेकरिता जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याबाबत उपस्थितांचे एकमत झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार १८ मे च्या रात्री बारा वाजल्यापासून ते ३१ मे चा रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

----

पर्यायी व्यवस्था बाजार समितीकडे

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहणार आहे. तसेच समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांची राहणार आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व साथरोग अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.