शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोले : पिचड पिता-पुत्रांनी टिकवली आघाडीची पत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:29 IST

देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती.

अकोले : देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती. यावेळी मात्र ती आघाडी थोपविण्यात आली. तालुक्याचे भूमिपुत्र माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना डावलून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना अकोलेतून मतांची चांगली आघाडी मिळाली.अकोले तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटात तीन भाजपा, एक सेना व दोन राष्ट्रवादी असे बलाबल आहे. गतवेळी या मतदारसंघात सेनेला ४ हजार ५९१ मतांची आघाडी होती. यावेळी वैभव पिचड हे कंबर कसून होते. विधानसभा निवडणूक जवळ असल्याने त्यांनी जोरदार बांधणी केली. दोन्ही कॉंग्रेसने ‘पंजा’ गावोगाव पोहोचविला.भाजप-सेनेत गट-तट असले तरी सर्वांनी एकत्र येऊन मनापासून मुळापर्यंत प्रचार केला तरी शिवसेनेला तालुक्यात आघाडी मिळू शकली नाही. कॉंग्रेसच्या कांबळे यांना ३१ हजार ६५१ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली. अन्य कुठल्याही मतदारसंघात ते आघाडीवर नाहीत. केवळ अकोल्याने त्यांची पत राखली. कांबळे यांना ८१ हजार १६५ मते मिळाली. अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना तालुक्याने १० हजार ३५६ मते दिली.मुळा खोरे आणि पठारावरील गावांचा मुंबईशी दांडगा संपर्क असल्याने येथील गावांचा कल दरवेळी सेनेकडेच असतो. तो यावेळी दिसला नाही. पिचड पिता-पुत्रांनी विधानसभेची नांदी समजून प्रचार केला. भाजपचे अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ.किरण लहामटे, जालिंदर वाकचौरे, सेनेच्या सुषमा दराडे, मधुकर तळपाडे यांनी आपआपले गटातील बुरुज पक्के करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसला आघाडी मिळाल्याने राष्टÑवादी विधानसभेसाठी बळकट झाली आहे.पिता-पुत्रांना यशअहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येतात तेथे सर्वत्र सेना-भाजपला आघाडी आहे. अपवाद फक्त अकोले विधानसभा मतदारसंघाचा आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरुन पिचड हे आक्रमक असतात. आदिवासी समाज सेना-भाजपला पाठिंबा देताना दिसत नाही. याहीवेळी धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण नको या मुद्यावर तीव्र भावना होत्या. त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळाला. देशभर मोदी लाट असताना अकोल्यात कॉंग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाल्याने राष्टÑवादीचे मनोबल वाढले आहे.की फॅक्टर काय ठरला?धनगर समाजाला आदिवासी संवर्गात आरक्षण मिळेल की काय? या मुद्यावरुन आदिवासी समाज भाजपवर नाराज आहे.शेतकऱ्यांची सरकारविषयी असलेली नाराजी मतात रुपांतर करण्यातही राष्टÑवादीला यश आले आहे.पठारावरील गावांचा मुंबईशी दांडगा संपर्क असल्याने येथील गावांचा कल दरवेळी सेनेकडेच असतो. परंतु यावेळी तो दिसला नाही.

विद्यमान आमदारवैभव पिचड। राष्टÑवादी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी