शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अकोले : पिचड पिता-पुत्रांनी टिकवली आघाडीची पत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:29 IST

देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती.

अकोले : देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती. यावेळी मात्र ती आघाडी थोपविण्यात आली. तालुक्याचे भूमिपुत्र माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना डावलून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना अकोलेतून मतांची चांगली आघाडी मिळाली.अकोले तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटात तीन भाजपा, एक सेना व दोन राष्ट्रवादी असे बलाबल आहे. गतवेळी या मतदारसंघात सेनेला ४ हजार ५९१ मतांची आघाडी होती. यावेळी वैभव पिचड हे कंबर कसून होते. विधानसभा निवडणूक जवळ असल्याने त्यांनी जोरदार बांधणी केली. दोन्ही कॉंग्रेसने ‘पंजा’ गावोगाव पोहोचविला.भाजप-सेनेत गट-तट असले तरी सर्वांनी एकत्र येऊन मनापासून मुळापर्यंत प्रचार केला तरी शिवसेनेला तालुक्यात आघाडी मिळू शकली नाही. कॉंग्रेसच्या कांबळे यांना ३१ हजार ६५१ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली. अन्य कुठल्याही मतदारसंघात ते आघाडीवर नाहीत. केवळ अकोल्याने त्यांची पत राखली. कांबळे यांना ८१ हजार १६५ मते मिळाली. अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना तालुक्याने १० हजार ३५६ मते दिली.मुळा खोरे आणि पठारावरील गावांचा मुंबईशी दांडगा संपर्क असल्याने येथील गावांचा कल दरवेळी सेनेकडेच असतो. तो यावेळी दिसला नाही. पिचड पिता-पुत्रांनी विधानसभेची नांदी समजून प्रचार केला. भाजपचे अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ.किरण लहामटे, जालिंदर वाकचौरे, सेनेच्या सुषमा दराडे, मधुकर तळपाडे यांनी आपआपले गटातील बुरुज पक्के करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसला आघाडी मिळाल्याने राष्टÑवादी विधानसभेसाठी बळकट झाली आहे.पिता-पुत्रांना यशअहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येतात तेथे सर्वत्र सेना-भाजपला आघाडी आहे. अपवाद फक्त अकोले विधानसभा मतदारसंघाचा आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरुन पिचड हे आक्रमक असतात. आदिवासी समाज सेना-भाजपला पाठिंबा देताना दिसत नाही. याहीवेळी धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण नको या मुद्यावर तीव्र भावना होत्या. त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळाला. देशभर मोदी लाट असताना अकोल्यात कॉंग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाल्याने राष्टÑवादीचे मनोबल वाढले आहे.की फॅक्टर काय ठरला?धनगर समाजाला आदिवासी संवर्गात आरक्षण मिळेल की काय? या मुद्यावरुन आदिवासी समाज भाजपवर नाराज आहे.शेतकऱ्यांची सरकारविषयी असलेली नाराजी मतात रुपांतर करण्यातही राष्टÑवादीला यश आले आहे.पठारावरील गावांचा मुंबईशी दांडगा संपर्क असल्याने येथील गावांचा कल दरवेळी सेनेकडेच असतो. परंतु यावेळी तो दिसला नाही.

विद्यमान आमदारवैभव पिचड। राष्टÑवादी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी