शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
4
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
5
बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
6
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
7
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
8
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
9
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
10
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
11
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
12
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
13
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
14
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
15
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
16
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
17
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
18
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
19
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
20
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक

शिवसेनेला खासदारकीचे डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:58 IST

अहमदनगर शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत.

अहमदनगर : शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत. आमदार होण्याचे अनेकांना स्वप्न आहे, मात्र अनिल राठोड हे आमदारकी सोडायला तयार नसल्याचे वक्तव्य करून शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी राठोड यांच्यावरच निशाणा साधला आहे, तर कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रह धरला आहे.दिवाळीनिमित्त सध्या राजकीय नेत्यांकडून दिवाळीचे फराळ सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. यानिमित्ताने राजकीय नेतेमंडळीही एकत्र येत आहेत. वाढदिवस असो, की दिवाळी फराळ अशा कार्यक्रमांमधून आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा सध्या शहर जिल्हा भाजपकडून केला जात आहे. याशिवाय आमदारकीवरही भाजपचाच डोळा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २२) माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा वाढदिवस व दिवाळी फराळाच्या निमित्ताने बुरुडगाव रोडवर शिवसेनेचा अनौपचारीक मेळावा झाला. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते, महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने फुटलेल्या राजकीय फटाक्यांमधून शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट झाली.या मेळाव्यात शिवसेनेने थेट दक्षिणेच्या खासदारकीवरच दावा केला आहे. घनश्याम शेलार यांनी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीच खासदारकीची निवडणूक लढवावी, असे सांगत पहिला फटाका फोडला. तोच सूर धरत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी अनिल राठोड हे काही आमदारकी सोडायला तयार नसल्याचे सांगून सर्वांच्याच मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे इच्छुकांना खासदारकी किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगत थेट राठोड यांच्यावरच निशाणा साधला. अनिल राठोड यांनी मात्र युती नसल्यानेच आपला पराभव झाल्याची कबुली दिली. भाजपच्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करून आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युती गरजेची असल्याचे संकेत दिले.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेनेला अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत झालेले शिवसेनेचे महापौर हे भाजपच्याच सहकार्यामुळे झाल्याचे अधोरेखित करून शिवसेना-भाजप युती शहरासाठी आवश्यक असल्याचे सांगत राठोड यांच्या सुरात सूर मिसळला.