शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

शिवसेनेला खासदारकीचे डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:58 IST

अहमदनगर शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत.

अहमदनगर : शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत. आमदार होण्याचे अनेकांना स्वप्न आहे, मात्र अनिल राठोड हे आमदारकी सोडायला तयार नसल्याचे वक्तव्य करून शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी राठोड यांच्यावरच निशाणा साधला आहे, तर कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रह धरला आहे.दिवाळीनिमित्त सध्या राजकीय नेत्यांकडून दिवाळीचे फराळ सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. यानिमित्ताने राजकीय नेतेमंडळीही एकत्र येत आहेत. वाढदिवस असो, की दिवाळी फराळ अशा कार्यक्रमांमधून आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा सध्या शहर जिल्हा भाजपकडून केला जात आहे. याशिवाय आमदारकीवरही भाजपचाच डोळा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २२) माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा वाढदिवस व दिवाळी फराळाच्या निमित्ताने बुरुडगाव रोडवर शिवसेनेचा अनौपचारीक मेळावा झाला. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते, महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने फुटलेल्या राजकीय फटाक्यांमधून शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट झाली.या मेळाव्यात शिवसेनेने थेट दक्षिणेच्या खासदारकीवरच दावा केला आहे. घनश्याम शेलार यांनी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीच खासदारकीची निवडणूक लढवावी, असे सांगत पहिला फटाका फोडला. तोच सूर धरत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी अनिल राठोड हे काही आमदारकी सोडायला तयार नसल्याचे सांगून सर्वांच्याच मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे इच्छुकांना खासदारकी किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगत थेट राठोड यांच्यावरच निशाणा साधला. अनिल राठोड यांनी मात्र युती नसल्यानेच आपला पराभव झाल्याची कबुली दिली. भाजपच्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करून आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युती गरजेची असल्याचे संकेत दिले.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेनेला अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत झालेले शिवसेनेचे महापौर हे भाजपच्याच सहकार्यामुळे झाल्याचे अधोरेखित करून शिवसेना-भाजप युती शहरासाठी आवश्यक असल्याचे सांगत राठोड यांच्या सुरात सूर मिसळला.