शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा : शाळांचे पत्रे उडाले, आंब्याचे नुकसान, साखर भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:55 IST

जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

ठळक मुद्दे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेचे पत्रे उडाले, झाडे व वीज खांब आडवेसंगमनरेमधील सारोळे पठारच्या शाळेचे पत्रे उडालेसंगमनेरातील युटेक शुगरची २५ कोटींची साखर भिजली

अहमदनगर : जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेचे पत्रे उडालेश्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण भागाला आज सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाचा फटका बसला. वादळामुळे शाळेवरील पत्रे उडाले तर ठिकठिकाणी झाडे व वीज खांब रस्त्यात आडवे झाले. रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने देवदैठणला चांगलाच फटका बसला. वाघमारे वस्ती (मेखणी) येथील जुनी इमारत असलेल्या जिल्हा परिषद शाळेवरील सोळा पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. सर्व भिंतींना जागोजागी तडे गेले. मागील भिंतही पडली. गावात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडी मुळापासून जागीच उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला. काही छपराची घरे, पोल्ट्रीचे पत्रे उडाले. गुंजाळ वस्तीवरील शेतीला वीज पुरवठा करणारे खांब पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.संगमनरेमधील सारोळे पठारच्या शाळेचे पत्रे उडालेसंगमनेर तालुक्याच्या पठार भागात दुपारनंतर वादळी वाºयासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. सारोळेपठार व परिसरात गारपीट होऊन वादळी वाºयाने शाळेवरील पत्रेही उडाले. या पावसाचा डाळिंब व इतर नगदी पिकांना फटका बसला. वादळी वाºयासह झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सारोळेपठार येथील शाळेवरील पत्रे उडून गेले.संगमनेरातील युटेक शुगरची २५ कोटींची साखर भिजलीसंगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथे आज वादळी वा-यासह झालेल्या आवकाळी पावसामुळे युटेक शुगर लिमीटेड साखर कारखान्याचे जवळपास ३४ कोटी रुपयाचे अर्थिक नुकसान झाल्याचे संस्थापक रवीद्रं बिरोले यांनी सांगितले. ४ वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे कारखान्याच्या साखर गोदामाचे खांब निखळून पडले. गोदामाचे पत्रे १ किलोमीटर अंतरावर उडून पडले आहेत. विक्रीसाठी उपलब्ध असलेली सुमारे २५ कोटी रुपयाची साखर भिजली. सुदैवाने यावेळी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.कर्जत तालुक्यातील राशीनसह सिध्दटेक, खेडमध्ये वादळी पाऊसकर्जत तालुक्यातील राशीनसह परीसरातील बारडगाव, भांबोरा, चिलवडी, सिध्दटेक व खेड येथेआज दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. वादळामुळे कांदा, चारा पिके भुईसपाट झाली असून खेडमध्ये आंब्याचे मोठे नुकसान झाले. राशीनचा मंमळवारी आठवडे बाजार होता. मात्र वादळी पावसामुळे बाजारकरूंची मोठी तारांबळ उडाली. वादळी वाºयामुळे कांदा, चारापिके भुईसपाट झाल्याने शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. खेड येथे आंब्याचा सडा पडला. चिलवडी, बारडगाव, सिध्दटेक येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाSangamnerसंगमनेरKarjatकर्जतKopargaonकोपरगाव