शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अहमदनगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा : शाळांचे पत्रे उडाले, आंब्याचे नुकसान, साखर भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:55 IST

जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

ठळक मुद्दे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेचे पत्रे उडाले, झाडे व वीज खांब आडवेसंगमनरेमधील सारोळे पठारच्या शाळेचे पत्रे उडालेसंगमनेरातील युटेक शुगरची २५ कोटींची साखर भिजली

अहमदनगर : जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेचे पत्रे उडालेश्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण भागाला आज सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाचा फटका बसला. वादळामुळे शाळेवरील पत्रे उडाले तर ठिकठिकाणी झाडे व वीज खांब रस्त्यात आडवे झाले. रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने देवदैठणला चांगलाच फटका बसला. वाघमारे वस्ती (मेखणी) येथील जुनी इमारत असलेल्या जिल्हा परिषद शाळेवरील सोळा पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. सर्व भिंतींना जागोजागी तडे गेले. मागील भिंतही पडली. गावात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडी मुळापासून जागीच उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला. काही छपराची घरे, पोल्ट्रीचे पत्रे उडाले. गुंजाळ वस्तीवरील शेतीला वीज पुरवठा करणारे खांब पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.संगमनरेमधील सारोळे पठारच्या शाळेचे पत्रे उडालेसंगमनेर तालुक्याच्या पठार भागात दुपारनंतर वादळी वाºयासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. सारोळेपठार व परिसरात गारपीट होऊन वादळी वाºयाने शाळेवरील पत्रेही उडाले. या पावसाचा डाळिंब व इतर नगदी पिकांना फटका बसला. वादळी वाºयासह झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सारोळेपठार येथील शाळेवरील पत्रे उडून गेले.संगमनेरातील युटेक शुगरची २५ कोटींची साखर भिजलीसंगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथे आज वादळी वा-यासह झालेल्या आवकाळी पावसामुळे युटेक शुगर लिमीटेड साखर कारखान्याचे जवळपास ३४ कोटी रुपयाचे अर्थिक नुकसान झाल्याचे संस्थापक रवीद्रं बिरोले यांनी सांगितले. ४ वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे कारखान्याच्या साखर गोदामाचे खांब निखळून पडले. गोदामाचे पत्रे १ किलोमीटर अंतरावर उडून पडले आहेत. विक्रीसाठी उपलब्ध असलेली सुमारे २५ कोटी रुपयाची साखर भिजली. सुदैवाने यावेळी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.कर्जत तालुक्यातील राशीनसह सिध्दटेक, खेडमध्ये वादळी पाऊसकर्जत तालुक्यातील राशीनसह परीसरातील बारडगाव, भांबोरा, चिलवडी, सिध्दटेक व खेड येथेआज दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. वादळामुळे कांदा, चारा पिके भुईसपाट झाली असून खेडमध्ये आंब्याचे मोठे नुकसान झाले. राशीनचा मंमळवारी आठवडे बाजार होता. मात्र वादळी पावसामुळे बाजारकरूंची मोठी तारांबळ उडाली. वादळी वाºयामुळे कांदा, चारापिके भुईसपाट झाल्याने शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. खेड येथे आंब्याचा सडा पडला. चिलवडी, बारडगाव, सिध्दटेक येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाSangamnerसंगमनेरKarjatकर्जतKopargaonकोपरगाव