शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Lok Sabha Election 2019: अहमदनगरमधील नगरसेवक द्विधा मनस्थितीत : कोणता झेंडा घेऊ हाती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 12:24 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या मतदारसंघात येणाऱ्या महापालिका व सात पालिका नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे़

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या मतदारसंघात येणाऱ्या महापालिका व सात पालिका नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे़ कोणता झेंडा घेऊ हाती, अशा द्विधा मनस्थितीत नगरसेवक आहेत़ त्यामुळे शहरी भागातील एक गठ्ठा मते पदरात पाडून घेण्यासाठी नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर आहे़लोकसभेची सर्वाधिक मते नगर शहरात आहेत़ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ़ विखे यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लक्ष घातले़ पण, या निवडणुकीत त्यांना फारसे यश आले नाही़ काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले़ काँग्रेस आघाडीविरोधात सेना-भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढविली़ सेनेचे २४, तर भाजपाचे १४ नगरसेवक निवडून आले़ या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली़ काँग्रेसचे डॉ़ विखे आता भाजपमध्ये आले आहेत़भाजप प्रवेशानंतर विखे यांनी महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या सेनेशी जवळीक साधली़ अर्थात सेनेची मते, हा त्यामागील हेतू आहे़ राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक निवडून आले़ त्यांनी सत्ता स्थापनेत भाजपाला साथ दिली़ पण, ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला, त्यांनाच आता राष्ट्रवादीकडून मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे विखे की जगताप, असा पेच सर्वच नगरसेवकांसमोर आहे़नगरपालिका नगरसेवकांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ पारनेर नगरपालिकेत सेनेचे सर्वाधिक ९ नगरसेवक आहेत़ मात्र या भागाचे नेतृत्व करणारे सेनेचे निलेश लंके आता राष्ट्रवादीत आले आहेत़ त्यामुळे या तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदललेली आहेत़ कर्जत नगरपालिकेत भाजपाचे सर्वाधिक १२ नगरसेवक आहेत़ काँग्रेसचे ४ , तर अपक्ष १ असे संख्याबळ आहे़ त्यामुळे कर्जत शहरात चमत्कार होईल, अशी स्थिती नाही़श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपाचे १३, राष्ट्रवादी २, काँग्रेस ४, असे संख्याबळ आहे़ या तालुक्यातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे़ या निर्णयावरही बरेच काही अवलंबून असणार आहे़ जामखेडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समीकरणे बदलली़ राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांनी कमळ हातामध्ये घेतले़ पण, दस्तुरखुद्द शरद पवारांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़ शेवगाव नगरपालिकेतही भाजपाचे १२, तर राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक आहेत़ राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १६, तर विखे-कर्डिले परिवर्तन आघाडीचे ६ नगरसेवक आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर