शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पुकारला बंद, सरकारच्या कृषि कायद्यांना विरोध

By शिवाजी पवार | Updated: November 1, 2023 15:51 IST

श्रीरामपूर येथील तहीलदार मिलिंदकुमार वाघ यांना येथील असोसिएशनच्या वतीने बंदचे निवेदन देण्यात आले. जिल्हा संचालक चेतन औताडे, तालुकाध्यक्ष राहुल उंडे यावेळी उपस्थित होते.

 

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकामधील काही नियम जाचक असल्याचा आरोप करत राज्यातील ७० हजार कृषी सेवा केंद्र चालकांनी गुरुवारपासून तीन दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रस्तावित कायदे रद्द करावे या मागणीसाठी २ ते ४ नोव्हेंबर या काळात तालुका फर्टिलायझर व डिलर्स असोसिएशनने बंद जाहीर केला. ऐन रब्बी हंगामात राज्यातील सत्तर हजार कृषी सेवा केंद्र बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

श्रीरामपूर येथील तहीलदार मिलिंदकुमार वाघ यांना येथील असोसिएशनच्या वतीने बंदचे निवेदन देण्यात आले. जिल्हा संचालक चेतन औताडे, तालुकाध्यक्ष राहुल उंडे यावेळी उपस्थित होते.

बंदच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी गरजेची खते, औषधे, बियाणे खरेदी करून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. वेळोवेळी कृषी सचिव, आयुक्त, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन या जाचक अटीमुळे व्यावसायिक व शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसानाची माहिती दिली. मात्र त्यात समाधानकारक तोडगा काढला नाही. त्यामुळे बंदचा निर्णय घेतल्याचे औताडे यांनी सांगितले.

प्रस्तावित पाच विधेयकांनुसार सदोष बियाणे, खते यांच्या विक्रीवर केंद्र चालकांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई होणार आहे. वास्तविक केंद्रांना कंपन्यांकडून मालाचा पुरवठा केला जातो. मालाच्या गुणवत्ता तपासणीसाठी कृषी विभागाचे स्वतःचे गुणनियंत्रक पथक असते. त्यामुळे व्यावसायिकांना दोषी धरण्याचे काहीही कारण नाही, असे जिल्हा असोसिशनचे संचालक चेतन औताडे यांनी सांगितले.

गुंडांच्या रांगेत बसविण्याचे प्रस्तावित केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील प्रतिष्ठेस धोका पोहोचेल. व्यवसाय चालू ठेवता येणार नाही. त्यामुळे कायद्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर