शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पुकारला बंद, सरकारच्या कृषि कायद्यांना विरोध

By शिवाजी पवार | Updated: November 1, 2023 15:51 IST

श्रीरामपूर येथील तहीलदार मिलिंदकुमार वाघ यांना येथील असोसिएशनच्या वतीने बंदचे निवेदन देण्यात आले. जिल्हा संचालक चेतन औताडे, तालुकाध्यक्ष राहुल उंडे यावेळी उपस्थित होते.

 

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकामधील काही नियम जाचक असल्याचा आरोप करत राज्यातील ७० हजार कृषी सेवा केंद्र चालकांनी गुरुवारपासून तीन दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रस्तावित कायदे रद्द करावे या मागणीसाठी २ ते ४ नोव्हेंबर या काळात तालुका फर्टिलायझर व डिलर्स असोसिएशनने बंद जाहीर केला. ऐन रब्बी हंगामात राज्यातील सत्तर हजार कृषी सेवा केंद्र बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

श्रीरामपूर येथील तहीलदार मिलिंदकुमार वाघ यांना येथील असोसिएशनच्या वतीने बंदचे निवेदन देण्यात आले. जिल्हा संचालक चेतन औताडे, तालुकाध्यक्ष राहुल उंडे यावेळी उपस्थित होते.

बंदच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी गरजेची खते, औषधे, बियाणे खरेदी करून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. वेळोवेळी कृषी सचिव, आयुक्त, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन या जाचक अटीमुळे व्यावसायिक व शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसानाची माहिती दिली. मात्र त्यात समाधानकारक तोडगा काढला नाही. त्यामुळे बंदचा निर्णय घेतल्याचे औताडे यांनी सांगितले.

प्रस्तावित पाच विधेयकांनुसार सदोष बियाणे, खते यांच्या विक्रीवर केंद्र चालकांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई होणार आहे. वास्तविक केंद्रांना कंपन्यांकडून मालाचा पुरवठा केला जातो. मालाच्या गुणवत्ता तपासणीसाठी कृषी विभागाचे स्वतःचे गुणनियंत्रक पथक असते. त्यामुळे व्यावसायिकांना दोषी धरण्याचे काहीही कारण नाही, असे जिल्हा असोसिशनचे संचालक चेतन औताडे यांनी सांगितले.

गुंडांच्या रांगेत बसविण्याचे प्रस्तावित केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील प्रतिष्ठेस धोका पोहोचेल. व्यवसाय चालू ठेवता येणार नाही. त्यामुळे कायद्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर