शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:51 IST

अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे.

श्रीगोंदा : डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम असलेल्या अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून अनाथाची भूक भागणार आहे.महादजी शिंदे, श्रीमंत विजयाराजे शिंदे कन्या ज्ञानदीप, स्वामी समर्थ, मुरलीधर होनराव, कौशल्यादेवी नागवडे, स्कूल सनराईज, जिल्हा परिषद मुले व मुलींची शाळा (श्रीगोंदा) जनता विद्यालय, कन्या जनता, परिक्रमा (काष्टी), इंदिरा गांधी (श्रीगोंदा फॅक्टरी), न्यू इंग्लिश (मढेवडगाव), व्यंकनाथ (लोणीव्यंकनाथ), छत्रपती शिवाजी (बेलवंडी) विद्याधाम (देवदैठण), यशवंतराव चव्हाण, घारगाव, कोळाईदेवी ( कोळगाव), पंडित जवाहरलाल नेहरू (आढळगाव), वळणेश्वर (अजनुज), पंडित जवाहरलाल नेहरू (पिंपळगाव पिसा), हंगेश्वर (हंगेवाडी) या विद्यालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.राज्यातील महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा, सावली सेवाभावी संस्था केडगाव अहमदनगर, अनामप्रेम संस्था अहमदनगर, जिजाऊ बालसदन कोळे, ता. कराड, आदिवासी युग प्रवर्तक दगडी बारडगाव ता. कर्जत, सहारा अनाथालय, गेवराई, जि. बीड. सेवालय संस्था, हासेगाव, औसा, जि. लातूर, सार्थक सेवा संघ आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे, अविश्रांती बालसदन दौंड, सहारा अनाथालय जामखेड, शाहू बोर्डिंग सातारा व महात्मा फुले आश्रमशाळा घारगाव या संस्थांना धान्य पाठविण्यात येत आहे.

अग्निपंख फौंडेशनच्या ‘एक मूठ अनाथांसाठी..’ राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होणार त्यामुळे हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज आहे.-तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य, महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा.

मला कुणाला तरी मदत करण्याची इच्छा होती आणि एक मूठ अनाथांसाठी... या उपक्रमात गोरगरीब विद्यार्थी मित्रांना धान्यरुपी मदत करताना खूप आनंद झाला. पुढील वर्षीही या उपक्रमात भाग घेणार आहे.-वैभव शिंदे, इयत्ता आठवी, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव.

महिलांचा सहभाग

या उपक्रमात आढळगाव येथील महिलांनी तसेच श्रीगोंदा व देवदैठण काही कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जादा धान्य दिले तर देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील साहील गुंजाळ या विद्यार्थ्यांने सर्व प्रकारचे धान्य दिले. तर वेळू येथील शेतकऱ्यांनी घरोघर फिरून १०० किलो धान्य जमा केले. आढळगाव येथील अग्निपंखचे लाईफमेंबर महेशराव शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजाराचा धनादेश दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा