शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:51 IST

अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे.

श्रीगोंदा : डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम असलेल्या अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून अनाथाची भूक भागणार आहे.महादजी शिंदे, श्रीमंत विजयाराजे शिंदे कन्या ज्ञानदीप, स्वामी समर्थ, मुरलीधर होनराव, कौशल्यादेवी नागवडे, स्कूल सनराईज, जिल्हा परिषद मुले व मुलींची शाळा (श्रीगोंदा) जनता विद्यालय, कन्या जनता, परिक्रमा (काष्टी), इंदिरा गांधी (श्रीगोंदा फॅक्टरी), न्यू इंग्लिश (मढेवडगाव), व्यंकनाथ (लोणीव्यंकनाथ), छत्रपती शिवाजी (बेलवंडी) विद्याधाम (देवदैठण), यशवंतराव चव्हाण, घारगाव, कोळाईदेवी ( कोळगाव), पंडित जवाहरलाल नेहरू (आढळगाव), वळणेश्वर (अजनुज), पंडित जवाहरलाल नेहरू (पिंपळगाव पिसा), हंगेश्वर (हंगेवाडी) या विद्यालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.राज्यातील महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा, सावली सेवाभावी संस्था केडगाव अहमदनगर, अनामप्रेम संस्था अहमदनगर, जिजाऊ बालसदन कोळे, ता. कराड, आदिवासी युग प्रवर्तक दगडी बारडगाव ता. कर्जत, सहारा अनाथालय, गेवराई, जि. बीड. सेवालय संस्था, हासेगाव, औसा, जि. लातूर, सार्थक सेवा संघ आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे, अविश्रांती बालसदन दौंड, सहारा अनाथालय जामखेड, शाहू बोर्डिंग सातारा व महात्मा फुले आश्रमशाळा घारगाव या संस्थांना धान्य पाठविण्यात येत आहे.

अग्निपंख फौंडेशनच्या ‘एक मूठ अनाथांसाठी..’ राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होणार त्यामुळे हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज आहे.-तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य, महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा.

मला कुणाला तरी मदत करण्याची इच्छा होती आणि एक मूठ अनाथांसाठी... या उपक्रमात गोरगरीब विद्यार्थी मित्रांना धान्यरुपी मदत करताना खूप आनंद झाला. पुढील वर्षीही या उपक्रमात भाग घेणार आहे.-वैभव शिंदे, इयत्ता आठवी, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव.

महिलांचा सहभाग

या उपक्रमात आढळगाव येथील महिलांनी तसेच श्रीगोंदा व देवदैठण काही कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जादा धान्य दिले तर देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील साहील गुंजाळ या विद्यार्थ्यांने सर्व प्रकारचे धान्य दिले. तर वेळू येथील शेतकऱ्यांनी घरोघर फिरून १०० किलो धान्य जमा केले. आढळगाव येथील अग्निपंखचे लाईफमेंबर महेशराव शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजाराचा धनादेश दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा