शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दोन दिवसांच्या पावसामुळे बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

केडगाव : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संक्रात ओढावली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून चिचोंडी पाटील, भातोडी, कापूरवाडी, वाळकी, ...

केडगाव : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संक्रात ओढावली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून चिचोंडी पाटील, भातोडी, कापूरवाडी, वाळकी, गुंडेगाव, खातगाव टाकळी, चास, कामरगाव परिसरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. त्यामुळे पाण्याअभावी तसेच किडींचा प्रादुर्भाव होऊन संकटात सापडलेल्या खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाचे आगमन झाल्याने बळीराजालाही दिलासा मिळाला आहे.

मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिल्याने नगर तालुक्यात खरीप लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, चारा पिके धरून जवळपास ५६ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, सलामीनंतर मध्यंतरी पावसाने प्रदीर्घ उघडीप दिली होती. खरीप हंगाम धोक्यात आला होता. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. चिचोंडी पाटील, भातोडी, पारगाव, टाकळी काझी, वाळकी, गुंडेगाव, चास, कामरगाव, सारोळा कासार, अकोळनेर, नेप्ती, जखणगाव, टाकळी खातगाव, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली. दमदार पावसाअभावी सिंचन विहिरींच्या पाणी पातळीत कुठलीही वाढ झालेली नाही.

तालुक्यात मूग सोयाबीनच्या लागवडीत मोठी वाढ झाली. काही तुरळक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस न झाल्याने तेथील पेरण्या खोळंबल्या. ज्या भागात पेरण्या उरकल्या होत्या तेथे पावसाअभावी पिके धोक्यात आली होती. पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही विलंबाने सुरू झाल्या. परिणामी, सोयाबीनचा अपवाद वगळता उडीद, मूग या कडधान्य पिकांसह अन्य पिकांचे क्षेत्र घटले आहे. दरम्यान, आधी विलंब आणि मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनचे पिके धोक्यात सापडले होते. पाण्याचा अभाव आणि अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळी वातावरणामुळे या पिकावर हिरवी उंटअळी, खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अशात गत दोन दिवसांपासून रिमझिम स्वरूपातील पाऊस होत असल्याने पिके धुऊन निघाली. किडींचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी घटल्याने वाळकी, गुंडेगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात ३९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

-----

नगर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला आहे. येणारे काही दिवस पावसाचेच असल्याने खरीप पिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. तालुक्यात ६४ हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट होते. मात्र, चारा पिके धरून ५६ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

-पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी, नगर

----

१० जखणगाव

जखणगाव येथे पावसानंतर बहरलेला मूग.

100721\img-20210710-wa0172.jpg

नगर तालुका फोटो = पावसामुळे खरीप पिकांना जिवदान मिळाले जखणगाव मधील पिकांचे छायाचित्र( छाया -योगेश गुंड )