शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बोंडअळीचे उर्वरित ३७ कोटी अखेर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:32 IST

बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले.

अहमदनगर : बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले. त्यामुळे शेतक-यांना दिवाळीच्या तोंडावर चांगलाच दिलासा मिळाला आहे. परंतु हे पैसे प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात कधी जमा होतात, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. या कपाशीचे पंचनामे करून नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडून १५७.२३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. हे अनुदान तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्त्यापोटी ८३ कोटी ७२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यातील ८३ कोटी ५१ लाख रूपयांचे वाटप शेतकºयांना करण्यात आले. (२० लाखांचे वाटप अद्याप बाकी) परंतु तरीही अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिल्याने जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्यासाठी ३७.६४ कोटी रूपयांची वाढीव मागणी २१ सप्टेंबर रोजी शासनाकडे कळवली होती.यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे या अनुदानाची वाट पाहत होते. अखेर दीड महिन्यानंतर उर्वरित ३७ कोटी ६४ लाख ३१ हजार ९९१ रूपयांचे बोंडअळीचे अनुदान शुक्रवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले आहे. आता येथून हे अनुदान संबंधित तहसीलकडे वर्ग होऊन तेथून थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दिवाळीच्या आधी हे अनुदान आले असले तरी प्रत्यक्षात दिवाळीला हे अनुदान शेतक-यांना मिळेल की दिवाळीनंतर, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.बोंडअळीच्या तिस-या टप्प्यातील ३७.६४ कोटी रकमेची मागणी शासनाकडे केली होती. अखेर हे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे जमा झालेले आहे. लवकरात लवकर संबंधित तहसीलकडे ही रक्कम वर्ग करून दिवाळीसाठी शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहील. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय