शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बोंडअळीचे उर्वरित ३७ कोटी अखेर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:32 IST

बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले.

अहमदनगर : बोंडअळीचे थकलेले तिसऱ्या टप्प्यातील ३७ कोटींचे अनुदान अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले. त्यामुळे शेतक-यांना दिवाळीच्या तोंडावर चांगलाच दिलासा मिळाला आहे. परंतु हे पैसे प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात कधी जमा होतात, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. या कपाशीचे पंचनामे करून नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडून १५७.२३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. हे अनुदान तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्त्यापोटी ८३ कोटी ७२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यातील ८३ कोटी ५१ लाख रूपयांचे वाटप शेतकºयांना करण्यात आले. (२० लाखांचे वाटप अद्याप बाकी) परंतु तरीही अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिल्याने जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्यासाठी ३७.६४ कोटी रूपयांची वाढीव मागणी २१ सप्टेंबर रोजी शासनाकडे कळवली होती.यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे या अनुदानाची वाट पाहत होते. अखेर दीड महिन्यानंतर उर्वरित ३७ कोटी ६४ लाख ३१ हजार ९९१ रूपयांचे बोंडअळीचे अनुदान शुक्रवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले आहे. आता येथून हे अनुदान संबंधित तहसीलकडे वर्ग होऊन तेथून थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दिवाळीच्या आधी हे अनुदान आले असले तरी प्रत्यक्षात दिवाळीला हे अनुदान शेतक-यांना मिळेल की दिवाळीनंतर, याकडे शेतकºयांचे लक्ष असेल.बोंडअळीच्या तिस-या टप्प्यातील ३७.६४ कोटी रकमेची मागणी शासनाकडे केली होती. अखेर हे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे जमा झालेले आहे. लवकरात लवकर संबंधित तहसीलकडे ही रक्कम वर्ग करून दिवाळीसाठी शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहील. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय