शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
12
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
13
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
14
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
15
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
16
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
17
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
18
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
19
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
20
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले

जनता कर्फ्यूबाबत ढकलाढकल, स्थानिक नेत्यांनीही सोडली जनतेवर जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:18 IST

अहमदनगर: नगर शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी होत असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हा निर्णय आता जनतेवरच सोडला आहे़ नगर शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी जाहीर केली़ 

अहमदनगर: नगर शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी होत असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हा निर्णय आता जनतेवरच सोडला आहे़ नगर शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी जाहीर केली़ 

नगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी पुढे आली आहे़ शहरातील विविध संघटनांनीही महापालिका आयुक्तांकडे तशी मागणी केली होती़ यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ हे काय निर्णय घेतात, याबाबत नगरकरांना उत्सुकता होती़ परंतु, पालकमंत्री मुश्रिफ यांनी जनता कर्फ्यूबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडली़ या बैठकीला आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते़ त्यांनीही पत्रकारांशी बोलताना आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत़ जनतेला जे हवे आहे, ते होईल़ शहरातील व्यापारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अन्य संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी दाखविली आहे़  शहरातील विविध घटकांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेऊनच पुढचा निर्णय होणार आहे़ राज्यातील काही शहरांत जनता कर्फ्यू लावण्यात आला़ परंतु, त्याचे पालन नागरिकांकडून होत नाही़ रस्त्यांवर गर्दी होतेच़ त्यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी होत नाही, असा अनुभव आहे़ ़़़शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, व्यापारी, विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल़- बाबासाहेब वाकळे, महापौऱ़़जनता कर्फ्यू लागू करण्यास विरोध नाही़ परंतु, जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी चर्चा करणे गरजेचे आहे़  सर्वांशी चर्चा करून याबाबाबत महापालिकेला कळविण्यात येईल़ -संग्राम जगताप, आमदार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या