शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हनुमंतगावपाठोपाठ आघीचाही वाळू ठेका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 13:34 IST

जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.

ठळक मुद्देदिघी ग्रामस्थांच्या लढ्याला यशअटी-शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई, ‘लोकमत’च्या मोहिमेचे ग्रामस्थांकडून स्वागत

अहमदनगर/जामखेड : जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.जिल्ह्यातील अवैध वाळूउपसाचे अनेक पुरावे ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. आघी येथील वाळूउपशाबाबतही दिघी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठेक्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. नियमानुसार उत्खनन झाले आहे का? तसेच किती उपसा झाला याबाबत तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी तपासणी करुन अहवाल पाठवावा असे आदेशात म्हटले आहे.या प्रकरणात पोलिसांनी आंदोलन करणाºया महिलांवर गुन्हे दाखल केले होते. जामखेड तालुक्यातील आघी व कर्जत तालुक्यातील दिघी ही दोन्ही गावे सीना नदीपात्राच्या बाजूलाआहेत.माजी पाटबंधारे मंत्री आबासाहेब निंबाळकर हे दिघी गावचे रहिवासी होते. ते हयात असताना त्यांनी येथील वाळूउपसा होऊ दिला नाही. त्यांचे सुपुत्र राजेंद्र निंबाळकर यांनीही सीना नदीपात्रातील वाळूउपसा करू नये याबाबत आंदोलन केले. त्यामुळे त्यांना कर्जत येथील राजकीय शक्तीचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी वाळूउपसा होऊ दिला नाही.वाळूउपसा न झाल्यामुळे पाणीसाठा वाढला तसेच दोन किलोमीटर अंतरावरील विहिरी, कूपनलिका यांना बारमाही पाणी असल्याने दुष्काळात सुद्धा टँकरची गरज भासली नव्हती.त्यामुळेच आपल्या शेतीच्या भवितव्यासाठी येथील ग्रामस्थ वाळूउपशाला विरोध करीतआहेत.आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रतापवाळूउपशाला विरोध करणाºया या आंदोलनात सरपंच देविदास महानगर, औदुंबर निंबाळकर, रोहित निंबाळकर, सोमनाथ महारनवर, महेश निंबाळकर, योगेश देवकर, प्रवीण इंगळे, मनोज देवकर, हिम्मत निंबाळकर, सुधीर भोईटे, नानासाहेब गोयकर, दत्तात्रय इंगळे आदी ग्रामस्थांसह महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. परंतु पोलिसांनी २२ महिला आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रताप केला. त्यामुळे पोलिसांच्या हेतूबाबतच संशय निर्माण होत आहे.राहुरी, कोपरगावचे ठेके अडचणीतकोपरगाव येथील मायगावदेवी येथील वाळू उत्खननाबाबतही ‘लोकमत’ने बातम्या प्रकाशित केल्या आहेत. या ठेक्याचीही प्रशासनाने तपासणी केली असून काही अनियमितता आढळल्या असल्याचे पालवे यांनी सांगितले. राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर येथे प्रशासनाला काही वाळूचा साठा सापडला होता. तसेच करजगाव व जातप येथील उपशाबाबत तक्रारी आहेत. तेथे तपासणी होणार का? याची प्रतीक्षा आहे.प्रशासन हादरलेवाळू उपशातील अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारकडे तक्रार केली आहे. अण्णांनी ‘लोकमत’च्या बातम्यांची कात्रणेच सरकारला पाठवली आहेत. ‘लोकमत’च्या वार्तांकनामुळे औरंगाबाद खंडपीठ व नगर जिल्हा न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला हा मोठा हादरा मानला जात आहे.लोकमतला धन्यवाद‘लोकमत’ने जिल्ह्यातील वाळूतस्करीबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच कारवाया सुरु झाल्या आहेत. जनतेतही आता जागृती येत आहे. वाळू तस्करांना कायद्याचा बडगा दाखविल्यास त्यांची दहशतच संपून जाईल. ती संपतही चालली आहे. - टिळक भोस, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय