शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
4
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
5
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
6
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
7
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
8
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
9
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
10
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
11
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
12
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
13
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
14
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
15
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
16
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
17
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
18
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
19
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
20
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह

हनुमंतगावपाठोपाठ आघीचाही वाळू ठेका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 13:34 IST

जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.

ठळक मुद्देदिघी ग्रामस्थांच्या लढ्याला यशअटी-शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई, ‘लोकमत’च्या मोहिमेचे ग्रामस्थांकडून स्वागत

अहमदनगर/जामखेड : जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.जिल्ह्यातील अवैध वाळूउपसाचे अनेक पुरावे ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. आघी येथील वाळूउपशाबाबतही दिघी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठेक्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. नियमानुसार उत्खनन झाले आहे का? तसेच किती उपसा झाला याबाबत तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी तपासणी करुन अहवाल पाठवावा असे आदेशात म्हटले आहे.या प्रकरणात पोलिसांनी आंदोलन करणाºया महिलांवर गुन्हे दाखल केले होते. जामखेड तालुक्यातील आघी व कर्जत तालुक्यातील दिघी ही दोन्ही गावे सीना नदीपात्राच्या बाजूलाआहेत.माजी पाटबंधारे मंत्री आबासाहेब निंबाळकर हे दिघी गावचे रहिवासी होते. ते हयात असताना त्यांनी येथील वाळूउपसा होऊ दिला नाही. त्यांचे सुपुत्र राजेंद्र निंबाळकर यांनीही सीना नदीपात्रातील वाळूउपसा करू नये याबाबत आंदोलन केले. त्यामुळे त्यांना कर्जत येथील राजकीय शक्तीचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी वाळूउपसा होऊ दिला नाही.वाळूउपसा न झाल्यामुळे पाणीसाठा वाढला तसेच दोन किलोमीटर अंतरावरील विहिरी, कूपनलिका यांना बारमाही पाणी असल्याने दुष्काळात सुद्धा टँकरची गरज भासली नव्हती.त्यामुळेच आपल्या शेतीच्या भवितव्यासाठी येथील ग्रामस्थ वाळूउपशाला विरोध करीतआहेत.आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रतापवाळूउपशाला विरोध करणाºया या आंदोलनात सरपंच देविदास महानगर, औदुंबर निंबाळकर, रोहित निंबाळकर, सोमनाथ महारनवर, महेश निंबाळकर, योगेश देवकर, प्रवीण इंगळे, मनोज देवकर, हिम्मत निंबाळकर, सुधीर भोईटे, नानासाहेब गोयकर, दत्तात्रय इंगळे आदी ग्रामस्थांसह महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. परंतु पोलिसांनी २२ महिला आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रताप केला. त्यामुळे पोलिसांच्या हेतूबाबतच संशय निर्माण होत आहे.राहुरी, कोपरगावचे ठेके अडचणीतकोपरगाव येथील मायगावदेवी येथील वाळू उत्खननाबाबतही ‘लोकमत’ने बातम्या प्रकाशित केल्या आहेत. या ठेक्याचीही प्रशासनाने तपासणी केली असून काही अनियमितता आढळल्या असल्याचे पालवे यांनी सांगितले. राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर येथे प्रशासनाला काही वाळूचा साठा सापडला होता. तसेच करजगाव व जातप येथील उपशाबाबत तक्रारी आहेत. तेथे तपासणी होणार का? याची प्रतीक्षा आहे.प्रशासन हादरलेवाळू उपशातील अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारकडे तक्रार केली आहे. अण्णांनी ‘लोकमत’च्या बातम्यांची कात्रणेच सरकारला पाठवली आहेत. ‘लोकमत’च्या वार्तांकनामुळे औरंगाबाद खंडपीठ व नगर जिल्हा न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला हा मोठा हादरा मानला जात आहे.लोकमतला धन्यवाद‘लोकमत’ने जिल्ह्यातील वाळूतस्करीबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच कारवाया सुरु झाल्या आहेत. जनतेतही आता जागृती येत आहे. वाळू तस्करांना कायद्याचा बडगा दाखविल्यास त्यांची दहशतच संपून जाईल. ती संपतही चालली आहे. - टिळक भोस, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय