शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हनुमंतगावपाठोपाठ आघीचाही वाळू ठेका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 13:34 IST

जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.

ठळक मुद्देदिघी ग्रामस्थांच्या लढ्याला यशअटी-शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई, ‘लोकमत’च्या मोहिमेचे ग्रामस्थांकडून स्वागत

अहमदनगर/जामखेड : जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.जिल्ह्यातील अवैध वाळूउपसाचे अनेक पुरावे ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. आघी येथील वाळूउपशाबाबतही दिघी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठेक्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. नियमानुसार उत्खनन झाले आहे का? तसेच किती उपसा झाला याबाबत तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी तपासणी करुन अहवाल पाठवावा असे आदेशात म्हटले आहे.या प्रकरणात पोलिसांनी आंदोलन करणाºया महिलांवर गुन्हे दाखल केले होते. जामखेड तालुक्यातील आघी व कर्जत तालुक्यातील दिघी ही दोन्ही गावे सीना नदीपात्राच्या बाजूलाआहेत.माजी पाटबंधारे मंत्री आबासाहेब निंबाळकर हे दिघी गावचे रहिवासी होते. ते हयात असताना त्यांनी येथील वाळूउपसा होऊ दिला नाही. त्यांचे सुपुत्र राजेंद्र निंबाळकर यांनीही सीना नदीपात्रातील वाळूउपसा करू नये याबाबत आंदोलन केले. त्यामुळे त्यांना कर्जत येथील राजकीय शक्तीचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी वाळूउपसा होऊ दिला नाही.वाळूउपसा न झाल्यामुळे पाणीसाठा वाढला तसेच दोन किलोमीटर अंतरावरील विहिरी, कूपनलिका यांना बारमाही पाणी असल्याने दुष्काळात सुद्धा टँकरची गरज भासली नव्हती.त्यामुळेच आपल्या शेतीच्या भवितव्यासाठी येथील ग्रामस्थ वाळूउपशाला विरोध करीतआहेत.आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रतापवाळूउपशाला विरोध करणाºया या आंदोलनात सरपंच देविदास महानगर, औदुंबर निंबाळकर, रोहित निंबाळकर, सोमनाथ महारनवर, महेश निंबाळकर, योगेश देवकर, प्रवीण इंगळे, मनोज देवकर, हिम्मत निंबाळकर, सुधीर भोईटे, नानासाहेब गोयकर, दत्तात्रय इंगळे आदी ग्रामस्थांसह महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. परंतु पोलिसांनी २२ महिला आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रताप केला. त्यामुळे पोलिसांच्या हेतूबाबतच संशय निर्माण होत आहे.राहुरी, कोपरगावचे ठेके अडचणीतकोपरगाव येथील मायगावदेवी येथील वाळू उत्खननाबाबतही ‘लोकमत’ने बातम्या प्रकाशित केल्या आहेत. या ठेक्याचीही प्रशासनाने तपासणी केली असून काही अनियमितता आढळल्या असल्याचे पालवे यांनी सांगितले. राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर येथे प्रशासनाला काही वाळूचा साठा सापडला होता. तसेच करजगाव व जातप येथील उपशाबाबत तक्रारी आहेत. तेथे तपासणी होणार का? याची प्रतीक्षा आहे.प्रशासन हादरलेवाळू उपशातील अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारकडे तक्रार केली आहे. अण्णांनी ‘लोकमत’च्या बातम्यांची कात्रणेच सरकारला पाठवली आहेत. ‘लोकमत’च्या वार्तांकनामुळे औरंगाबाद खंडपीठ व नगर जिल्हा न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला हा मोठा हादरा मानला जात आहे.लोकमतला धन्यवाद‘लोकमत’ने जिल्ह्यातील वाळूतस्करीबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच कारवाया सुरु झाल्या आहेत. जनतेतही आता जागृती येत आहे. वाळू तस्करांना कायद्याचा बडगा दाखविल्यास त्यांची दहशतच संपून जाईल. ती संपतही चालली आहे. - टिळक भोस, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय