शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

छावण्या मंजुरीनंतर आता जनावरांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:47 IST

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत.

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत. आपली जनावरे दुसऱ्या छावणीत जाता कामा नये, या गावातील राजकारणाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाच बसला आहे.मंजूर छावण्यांपैकी बहुतांश छावण्या अद्याप सुरूच झालेल्या नाहीत. कमीत कमी ३०० जनावरे असणाऱ्या छावण्यांनाच शासन अनुदान देणार आहे. त्यामुळे हे ३०० जनावरे जमवण्याचे काम छावणीचालकांकडून सुरू आहे. काही गावांत तेवढे जनावरे तर आहेत. परंतु राजकारणातून किंवा विरोधातून जनावरे छावणीत येऊ दिले जात नाहीत. अनेक गावांत एकापेक्षा जास्तजण छावणी चालवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे गावात छावणी मंजूर असली तरी त्यात जनावरे जाण्यापासून रोखले जात आहेत. ऐनवेळी छावणीचा आपला प्रस्ताव मंजूर झाला, तर ३०० जनावरे आणायची कोठून, या स्पर्धेतूनही ही स्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनाच जास्त छावण्या मंजूर झाल्याचेही आरोप होत आहेत. एकंदरीतच दुष्काळात व तेही मुक्या प्राण्यांच्या बाबतीत आर्थिक गणितातून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळते आहे.आतापर्यंत जिल्ह्यात ४६ छावण्या मंजूरआतापर्यंत ४६ छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून यात सर्वाधिक २७ छावण्या पाथर्डी तालुक्यात आहेत. त्यानंतर पारनेर व जामखेड तालुक्यात प्रत्येकी ६, नगर व कर्जतमध्ये प्रत्येकी ३, तर श्रीगोंदा तालुक्यात १ छावणी मंजूर आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर