शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

४० वर्षानंतर मढीत पोहोचले वांबोरी चारीचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 17:07 IST

अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. 

मढी : अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी शेतकºयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुष्काळी पश्चिम भागाला मुळा धरणातून चारीद्वारे पाणी मिळावे म्हणून गेल्या ४० वर्षापासून या भागात मोठी आंदोलने झाली. अनेकांना तुरुंगवास झाला. शासनाने याची दखल घेवून मुळा चारीचे रूपांतर बंद पाईपद्वारे या भागाला पाणी देण्यासाठी पाईप योजना केली. योजना पूर्ण होवून १० वर्ष झाली. मात्र या योजनेला ठेकेदाराने केलेले अपूर्ण काम, योजनेतील त्रुटी, अनाधिकृत कनेक्शन्स यामुळे पाणी आले नाही. मध्यंतरी योजनेच्या ट्रायलच्या दरम्यान एकदा मढी येथे पाणी पोहोचले होते मात्र ते तत्काळ बंद करण्यात आले होते. सलग दोन वर्ष या भागात दुष्काळ पडला. या प्रश्नावर दै. ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच या भागात जनजागृती झाली. पुन्हा वांबोरी चारीचे आंदोलन पेटले. प्रशासन व राज्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या अथक परिश्रमामुळे या योजनेच्या ‘टेल’ला असणाºया मढी गावच्या तलावात पाणी नेण्यात यश आले.मढी, घाटसिरस या भागातील फळबागा दुष्काळामुळे जळाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याचे संकट वाड्यावस्त्यांवर जाणवत असताना वांबोरी चारीच्या पाण्याने या भागातील शेतकºयांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ‘टेल’ला पाणी आल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असे शेतकरी भगवान मरकड, बबन मरकड यांनी सांगितले.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाAhmednagarअहमदनगर