शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांनी अश्विनात आला अधिक महिना ; बाजाराची मरगळ हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:37 IST

अहमदनगर : अधिक मासाला शुक्रवार (दि. १८) पासून सुरूवात होत आहे. पितृपक्षाची गुरुवारी (दि. १७) सांगता झाल्याने गेल्या पंधरादिवसांपासून बाजारावर असलेली मरगळ हटणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अश्विन महिन्यात अधिक मास आल्यामुळे घटस्थापना, नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी एक महिना लांबणीवर पडली आहे.

अहमदनगर : अधिक मासाला शुक्रवार (दि. १८) पासून सुरूवात होत आहे. पितृपक्षाची गुरुवारी (दि. १७) सांगता झाल्याने गेल्या पंधरादिवसांपासून बाजारावर असलेली मरगळ हटणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अश्विन महिन्यात अधिक मास आल्यामुळे घटस्थापना, नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी एक महिना लांबणीवर पडली आहे.

दर तीन वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. दर १९ वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो, असा कालगणनेचा सर्वसाधारण नियम आहे. यापूर्वी २००१ मध्ये अश्विन महिन्यात अधिक मास आला होता, अशी माहिती पंचांगांत नमूद करण्यात आली आहे. यंदाचा अधिक मास हा अश्विन महिना आहे. तीन वर्षांनी येणारा अधिक मास हा श्रावण महिना असणार आहे.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असे १२ चांद्र मास आहेत. एका अमावस्येपासून दुसºया अमावस्येपर्यंत एक चांद्र मास असतो. मीन राशीत ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, त्यास चैत्र, मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, त्यास वैशाख मास म्हणतात. याप्रमाणे पुढील अनुक्रमाने पुढील चांद्र मास येतात. प्रत्येक चांद्र महिन्यात सूर्याचे राशीसंक्रमण झाले तर तो नेहमीचा चांद्र मास असतो. परंतु ज्या चांद्र मासात सूर्याचे राशीसंक्रमण होत नाही, त्या महिन्यास अधिक मास,मल मास, किंवा धोंडा मास म्हणतात, असे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक महिन्याची एक देवता सांगितलेली आहे.  अधिक मासाची देवता भगवान श्रीकृष्ण असल्याने अधिक मासास ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते. ----घटस्थापना १७ आॅक्टोबरलापितृपक्षाची सांगता सर्वपित्री आमावस्येला होते. त्याच्या दुसºया दिवशी घटस्थापना होते. यंदा अधिक मास आल्याने घटस्थापना एक महिना लांबणीवर म्हणजे १७ आॅक्टोबरला होणार आहे, तर दसरा २५ आॅक्टोबरला आहे.  गतवर्षी दिवाळी २७ आॅक्टोबरपासून सुरू झाली होती, यंदा १४ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होणार आहे. ------अधिक मासात साखरपुडा, बारसे, डोहाळेजेवण, जावळ, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी, नवीन व्यवसायाचा आरंभ करता येतो. विवाह, वास्तुशांती असे कार्यक्रम मात्र या महिन्यात करता येत नाहीत. जी कर्मे करणे आवश्यक आहे, ती सर्व या महिन्यात करावीत.  अधिक महिना विष्णूचा महिना समजला जातो. जावयाला विष्णू स्वरूप मानले असल्याने जावयाला वाण देण्याची प्रथा आहे.-किशोर जोशी, अध्यक्ष, पुरोहित संघ---------- 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarketबाजार