शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

प्रशासन लॉकडाऊन करणार नाही, लोकांनी स्वत: लॉक व्हावे-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:14 IST

प्रशासन आता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करणार नाही. प्रत्येक जण प्रशासनावरच जबाबदारी ढकलण्याची वृत्ती दिसून येते. लोकांनी स्वत:हुन लॉक करून घेतले, तर कोरोनाचा संसर्ग समाजात पसरणार नाही. लोकांनी नियम पाळावेत, लवकरच रुग्णवाढीचा दर कमी होईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

अहमदनगर : प्रशासन आता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करणार नाही. प्रत्येक जण प्रशासनावरच जबाबदारी ढकलण्याची वृत्ती दिसून येते. लोकांनी स्वत:हुन लॉक करून घेतले, तर कोरोनाचा संसर्ग समाजात पसरणार नाही. लोकांनी नियम पाळावेत, लवकरच रुग्णवाढीचा दर कमी होईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुकपेजवरून द्विवेदी यांनी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकांनी गर्दी टाळावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. आजही अनेक लोक बेफिकीरपणे वागत आहेत. अनेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पालन केले तर कोरोना वाढणार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी चर्चा आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत नाही तर ते प्रशासन शोधत आहे. संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने चाचणी संख्या वाढविली आहे. या चाचण्या म्हणजे रुग्णांचा शोध आहे. त्यामुळे नागरिकांनी भिती बाळगण्याची गरज नाही. करोना आता सगळीकडेच पसरला आहे. लोकांनीच आता जपून वागले पाहिजे. मास्क अनिवार्य आहे. प्रत्येकाला वाटते की प्रशासनाने लॉकडाऊन केला पाहिजे. मात्र लोकांनी स्वत:हुन आपल्या इमारती, सोसायटी लॉक करावी. पंधरा दिवस कोणीही सोसायटीच्या बाहेर जाऊ नये. अशी दक्षता घेतली तर कोरोनाची साखळी कमी करता येतील. सध्या दोन हजारपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या जात आहेत. त्याची संख्या आणखी वाढविणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करीत आहे, नागरिकांनी काय केले पाहिजे, याबाबत द्विवेदी यांनी सविस्तरपणे सांगितले. चाचणी वाढविल्यामुळे समाजात होणारा संसर्ग कमी झाला आहे. अनेक लोक स्वत:हुन तपासणी करण्यासाठी येत नाहीत. चाचण्या वाढवल्यामुळे उपचार करणे व समाजापासून विभक्त करणे त्याला लगेच शक्य होते. यामुळे धोका कमी होत असल्याने लोकांनी स्वत:हुन क्वारंटाईन झाले पाहिजे. क्रिटीकल स्टेजमध्ये आल्यानंतर उपचार करणे अशक्य होते. अद्याप कोणतेही व्हॅक्सिन तयार झालेले नसल्याने लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मृत्यू दुर्दैवी आहे. पण लोकांनी लक्षणे आढळल्यास व प्रकृती चिंताजनक होण्याआधीच दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी