शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन लॉकडाऊन करणार नाही, लोकांनी स्वत: लॉक व्हावे-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:14 IST

प्रशासन आता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करणार नाही. प्रत्येक जण प्रशासनावरच जबाबदारी ढकलण्याची वृत्ती दिसून येते. लोकांनी स्वत:हुन लॉक करून घेतले, तर कोरोनाचा संसर्ग समाजात पसरणार नाही. लोकांनी नियम पाळावेत, लवकरच रुग्णवाढीचा दर कमी होईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

अहमदनगर : प्रशासन आता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करणार नाही. प्रत्येक जण प्रशासनावरच जबाबदारी ढकलण्याची वृत्ती दिसून येते. लोकांनी स्वत:हुन लॉक करून घेतले, तर कोरोनाचा संसर्ग समाजात पसरणार नाही. लोकांनी नियम पाळावेत, लवकरच रुग्णवाढीचा दर कमी होईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुकपेजवरून द्विवेदी यांनी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकांनी गर्दी टाळावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. आजही अनेक लोक बेफिकीरपणे वागत आहेत. अनेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पालन केले तर कोरोना वाढणार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी चर्चा आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत नाही तर ते प्रशासन शोधत आहे. संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने चाचणी संख्या वाढविली आहे. या चाचण्या म्हणजे रुग्णांचा शोध आहे. त्यामुळे नागरिकांनी भिती बाळगण्याची गरज नाही. करोना आता सगळीकडेच पसरला आहे. लोकांनीच आता जपून वागले पाहिजे. मास्क अनिवार्य आहे. प्रत्येकाला वाटते की प्रशासनाने लॉकडाऊन केला पाहिजे. मात्र लोकांनी स्वत:हुन आपल्या इमारती, सोसायटी लॉक करावी. पंधरा दिवस कोणीही सोसायटीच्या बाहेर जाऊ नये. अशी दक्षता घेतली तर कोरोनाची साखळी कमी करता येतील. सध्या दोन हजारपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या जात आहेत. त्याची संख्या आणखी वाढविणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करीत आहे, नागरिकांनी काय केले पाहिजे, याबाबत द्विवेदी यांनी सविस्तरपणे सांगितले. चाचणी वाढविल्यामुळे समाजात होणारा संसर्ग कमी झाला आहे. अनेक लोक स्वत:हुन तपासणी करण्यासाठी येत नाहीत. चाचण्या वाढवल्यामुळे उपचार करणे व समाजापासून विभक्त करणे त्याला लगेच शक्य होते. यामुळे धोका कमी होत असल्याने लोकांनी स्वत:हुन क्वारंटाईन झाले पाहिजे. क्रिटीकल स्टेजमध्ये आल्यानंतर उपचार करणे अशक्य होते. अद्याप कोणतेही व्हॅक्सिन तयार झालेले नसल्याने लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मृत्यू दुर्दैवी आहे. पण लोकांनी लक्षणे आढळल्यास व प्रकृती चिंताजनक होण्याआधीच दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी