शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरमध्ये राबविणार आदर्शगाव योजना : सरहद संस्थेचा पुढाकार

By साहेबराव नरसाळे | Updated: November 15, 2018 12:34 IST

साहेबराव नरसाळे अहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी ...

साहेबराव नरसाळेअहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी काश्मिरमधील तरुणांच्या टीमने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शगाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.काश्मिरमधील अनंतनाग, कुपवाडा, बारामुला या जिल्ह्यात आदर्श गाव योजना राबविण्याबाबत ५० संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे सर्व्हे सुरु करण्यात आला आहे़ सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी काश्मिरमधील तरुणांची हजारे व पवार यांची भेट घडवून आणली़ बुधवारी या टीमने राळेगणसिद्धी व हिवरेबाजारमधील कामांची पाहणी केली़ गाव विकासात लोकसहभाग कसा वाढविता येईल, याबाबत हजारे व पवार यांच्याशी चर्चा केली़ या टीममध्ये जाहीद भट, ओवैसी वाणी, फिराज खान, इलियास खान, तुफेल भट, मुस्ताक ख्वाजा यांचा समावेश आहे़ ही सर्व टीम सरहद संस्थेअंतर्गत काश्मिरमधील विविध प्रश्नांवर काम करीत आहे.अण्णा हजारे जाणार काश्मिरलाकाश्मिरमध्ये दूध उत्पादन, गाव विकासासाठी कोणत्या योजना राबविण्यात येतील, याबाबत तरुणांनी हजारे यांच्याशी चर्चा केली़ ‘काश्मिरमध्ये लोकसहभागातून काम करण्यास मोठा वाव आहे़ तुम्ही गावांची निवड करुन कळवा़ मी येतो,’ असे आश्वासन हजारे यांनी दिल्याची माहिती भट यांनी दिली़यापूर्वीही झाला होता प्रयत्ननोव्हेंबर २००० साली सरहद संस्थेने काश्मिरमध्ये आदर्शगाव योजना राबविण्याबाबत पुढाकार घेतला होता़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काश्मिरमध्ये बैठकाही घेतल्या होत्या़ अनेक संस्था एकत्र येऊन काम करीत होत्या़ मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडले होते.पुढील आठवड्यात बैठकलोकांमध्ये एकात्मता निर्माण करुन मातीशी जोडलेल्या माणसांना एकत्र केल्यास काश्मिरमध्येही आदर्श गाव योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे पोपटराव पवार यांनी काश्मिरमधील तरुणांना आश्वासित केले़ पुढील आठवड्यात गाव विकासाच्या मुद्यावर एकत्र येणाऱ्यांची बैठक घेऊन तेथील टीम पुन्हा राळेगणसिद्धी व हिवरेबाजारला आणणार असल्याचे भट यांनी सांगितले़युवकांना सोबत घेऊन पूर्वीच्याच गाव विकासाच्या आराखड्याला मूर्त स्वरुप देण्याचे नियोजन सुरु आहे़ लोकसहभागातून आदर्श गाव योजना काश्मिरमध्ये राबविण्याबाबत अण्णा हजारे व पोपटराव पवार यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. -संजय नहार, संस्थापक अध्यक्ष, सरहद संस्था, पुणे

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर