शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

काश्मिरमध्ये राबविणार आदर्शगाव योजना : सरहद संस्थेचा पुढाकार

By साहेबराव नरसाळे | Updated: November 15, 2018 12:34 IST

साहेबराव नरसाळे अहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी ...

साहेबराव नरसाळेअहमदनगर : लोकसहभागातून काश्मिरमधील तीन जिल्ह्यांत आदर्श गाव योजना राबविण्याचा निर्णय सरहद संस्थेने घेतला असून, त्याबाबत बुधवारी काश्मिरमधील तरुणांच्या टीमने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्शगाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.काश्मिरमधील अनंतनाग, कुपवाडा, बारामुला या जिल्ह्यात आदर्श गाव योजना राबविण्याबाबत ५० संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे सर्व्हे सुरु करण्यात आला आहे़ सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी काश्मिरमधील तरुणांची हजारे व पवार यांची भेट घडवून आणली़ बुधवारी या टीमने राळेगणसिद्धी व हिवरेबाजारमधील कामांची पाहणी केली़ गाव विकासात लोकसहभाग कसा वाढविता येईल, याबाबत हजारे व पवार यांच्याशी चर्चा केली़ या टीममध्ये जाहीद भट, ओवैसी वाणी, फिराज खान, इलियास खान, तुफेल भट, मुस्ताक ख्वाजा यांचा समावेश आहे़ ही सर्व टीम सरहद संस्थेअंतर्गत काश्मिरमधील विविध प्रश्नांवर काम करीत आहे.अण्णा हजारे जाणार काश्मिरलाकाश्मिरमध्ये दूध उत्पादन, गाव विकासासाठी कोणत्या योजना राबविण्यात येतील, याबाबत तरुणांनी हजारे यांच्याशी चर्चा केली़ ‘काश्मिरमध्ये लोकसहभागातून काम करण्यास मोठा वाव आहे़ तुम्ही गावांची निवड करुन कळवा़ मी येतो,’ असे आश्वासन हजारे यांनी दिल्याची माहिती भट यांनी दिली़यापूर्वीही झाला होता प्रयत्ननोव्हेंबर २००० साली सरहद संस्थेने काश्मिरमध्ये आदर्शगाव योजना राबविण्याबाबत पुढाकार घेतला होता़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काश्मिरमध्ये बैठकाही घेतल्या होत्या़ अनेक संस्था एकत्र येऊन काम करीत होत्या़ मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडले होते.पुढील आठवड्यात बैठकलोकांमध्ये एकात्मता निर्माण करुन मातीशी जोडलेल्या माणसांना एकत्र केल्यास काश्मिरमध्येही आदर्श गाव योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे पोपटराव पवार यांनी काश्मिरमधील तरुणांना आश्वासित केले़ पुढील आठवड्यात गाव विकासाच्या मुद्यावर एकत्र येणाऱ्यांची बैठक घेऊन तेथील टीम पुन्हा राळेगणसिद्धी व हिवरेबाजारला आणणार असल्याचे भट यांनी सांगितले़युवकांना सोबत घेऊन पूर्वीच्याच गाव विकासाच्या आराखड्याला मूर्त स्वरुप देण्याचे नियोजन सुरु आहे़ लोकसहभागातून आदर्श गाव योजना काश्मिरमध्ये राबविण्याबाबत अण्णा हजारे व पोपटराव पवार यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. -संजय नहार, संस्थापक अध्यक्ष, सरहद संस्था, पुणे

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर