शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या बोगस बियाणांप्रकरणी कारवाई गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST

पानसरे म्हणाले, आम्ही मोठ्या कष्टाने शेती पिकवतो. कांदा हे शाश्वत पैसे देणारे पीक आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी ...

पानसरे म्हणाले, आम्ही मोठ्या कष्टाने शेती पिकवतो. कांदा हे शाश्वत पैसे देणारे पीक आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा उत्पादन घेण्याचे ठरविले. मात्र शेतकऱ्यांची मागणी पाहून अनेक बीज कंपन्या व दुकानदारांनी बनावट बी शेतकऱ्यांना विकले. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली. महागड्या किमतीचे बी घेऊन शेतीची मशागत करून हे बी पेरले. मात्र सर्व बी हे बोगस असल्याने त्याची उगवण झाली नाही. जेथे उगवले त्या पिकास डोंगळे निघाले. यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. आधीच कोरोना संकटामुळे शेतमालाला बाजार नसल्याने बेजार झालेल्या शेतकरी हा कांदा न उगवल्याने आणखीच अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे.

केंद्र सरकार तर हे शेतकरीविरोधीच आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार भावनिक मुद्द्यांवर हात घालून तेढ निर्माण करत आहेत. म्हणून शेतकरी वर्गातून मोठा संताप व्यक्त होत असल्याची टीका भास्‍कर पानसरे यांनी केली आहे.

याचबरोबर याबाबत वेळोवेळी पंचायत समिती, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे. मात्र त्यांनी अतिशय बेजबाबदार उत्तरे देत शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे जावे, असे मोफत सल्ले दिले आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. अहमदनगर जिल्हा व परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी बी कंपन्या व दुकानदारांचा निषेध केला असून, याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.