शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कांद्याच्या बोगस बियाणांप्रकरणी कारवाई गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST

पानसरे म्हणाले, आम्ही मोठ्या कष्टाने शेती पिकवतो. कांदा हे शाश्वत पैसे देणारे पीक आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी ...

पानसरे म्हणाले, आम्ही मोठ्या कष्टाने शेती पिकवतो. कांदा हे शाश्वत पैसे देणारे पीक आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा उत्पादन घेण्याचे ठरविले. मात्र शेतकऱ्यांची मागणी पाहून अनेक बीज कंपन्या व दुकानदारांनी बनावट बी शेतकऱ्यांना विकले. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली. महागड्या किमतीचे बी घेऊन शेतीची मशागत करून हे बी पेरले. मात्र सर्व बी हे बोगस असल्याने त्याची उगवण झाली नाही. जेथे उगवले त्या पिकास डोंगळे निघाले. यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. आधीच कोरोना संकटामुळे शेतमालाला बाजार नसल्याने बेजार झालेल्या शेतकरी हा कांदा न उगवल्याने आणखीच अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे.

केंद्र सरकार तर हे शेतकरीविरोधीच आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार भावनिक मुद्द्यांवर हात घालून तेढ निर्माण करत आहेत. म्हणून शेतकरी वर्गातून मोठा संताप व्यक्त होत असल्याची टीका भास्‍कर पानसरे यांनी केली आहे.

याचबरोबर याबाबत वेळोवेळी पंचायत समिती, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे. मात्र त्यांनी अतिशय बेजबाबदार उत्तरे देत शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे जावे, असे मोफत सल्ले दिले आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. अहमदनगर जिल्हा व परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी बी कंपन्या व दुकानदारांचा निषेध केला असून, याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.