शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

लाभार्थ्यांची यादी न लावणार्‍यांवर कारवाई

By admin | Updated: June 3, 2014 00:26 IST

अहमदनगर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य घेऊन जाणार्‍या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी दर महिन्याला लावणे बंधनकारक आहे.

अहमदनगर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य घेऊन जाणार्‍या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी दर महिन्याला लावणे बंधनकारक आहे. ती यादी न लावणार्‍या दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिला. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, प्रकाश भोसले, राजाराम जठार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे यांनी प्रारंभी जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा आढावा घेतला. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात लाभार्थी निवडण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अन्न सुरक्षा योजना ही गरिबांच्या तोंडी घास पडावा, या सद्हेतूने सुरु करण्यात आली आहे. तथापि, यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांची नावे असल्याच्या तक्रारी आहेत. वास्तविक या योजनेतील लाभार्थी ग्रामसभेने निवडलेले असतात. गावातील लोकांना कोण गरीब आहेत, कोण श्रीमंत आहे, हे माहिती असते, असे असतांना खरे लाभार्थी वंचित राहून खोट्या लाभार्थींची नावे समाविष्ट होणे चुकीचे आहे. गावकर्‍यांनी असे खोटे लाभार्थी यादीतून वगळण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते, असे अन्नधान्य घेऊन जाणार्‍या लाभार्थींची यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी सूचना फलकावर लावावी, अशी यादी न लावल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या कामी ज्या यंत्रणांवर जबाबदारी आहे, त्यांनीही दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी कवडे यांनी स्पष्ट केले. गावाच्या प्रश्नाबाबत जागरुक असायला हवे, असेही कवडे म्हणाले. दारिद््रयरेषेखालील लाभार्थी, वैयक्तिक योजनांचे लाभार्थी निवडीबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही न करता काहीवेळेस बेकायदेशीररित्या निवड होते, गावकर्‍यांनी अशा बेकायदेशीर कृत्याला पाठिंबा देता कामा नये असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी पुरवठा विभागाची माहिती सादर केली. जिल्ह्यात १६३१ स्वस्त धान्य दुकाने, २२४१ किरकोळ केरोसिन परवानाधारक, ३६ केरोसिन घाऊक परवानाधारक कार्यरत आहेत. जिल्ह्यात ४० गॅस एजन्सी आहेत. जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत एकूण ३१ लाख ९५ हजार ६५१ लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. ३० लाख ५१ हजार १२५ लाभार्थी निवडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)