शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अपहरण, रेप, पोलिसांवर गोळीबार: ये अहमदनगर है़, या लूटमारनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:40 IST

तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़.

अरुण वाघमोडे /  अहमदनगर : गजबजलेल्या चौकातून उद्योजकाचे अपहरण, रस्त्याच्या कडेला वाहनात तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़. या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी सराईत गुन्हेगारांची वाढलेली ही हिंमत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नक्कीच घातक आहे.गुन्हेगारांबाबत ‘कानून के हाथ लंबे होते है’! असा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. नगर जिल्ह्याबाबत मात्र ‘कानून के हाथ हमारे यहाँ तो बंधे होते है’! असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांतील आणि काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सराईत गुन्हेगारांनी जनतेसह पोलिसांनाही हैराण करून सोडले आहे़. घरफोड्या, रस्तालूट, वाहनचोरी या घटना सुरूच असताना आता भरदिवसा आणि भरचौकातून अपहरण आणि पोलिसांवर गोळीबाराच्या घटना घडू लागल्याने जनतेमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कानून के हाथ लंबे करून पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशीच जनतेची मागणी आहे़.    नगर शहरातील सर्जेपुरा येथून १८ नोव्हेंबर रोजी अजहर मंजूर शेख या कुख्यात गुंडाच्या टोळीने प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली़. या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले असले तरी मुख्य सूत्रधार अजहर हा अजून फरार आहे. १९ नोव्हेंबर रोजी शहरातील क्लेरा ब्रुस विद्यालयाच्या मैदानाजवळ रस्त्यावरच एका वाहनचालकाने पिकअप वाहनात तरुणीवर अत्याचार केला. कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. २० नोव्हेंबर रोजी तर राहाता येथे सराईत गुन्हेगारांनी थेट पोलिसांवरच गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या घटनेत एका पोलीस कर्मचा-याला दोन गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी राहुरीत पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुन्हेगारांनी दगडफेक केली. गेल्या आठ दिवसात एकसलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा अपहरणाच्या घटना आणि थेट पोलिसांवर गोळीबार होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हुंडेकरी यांचे अपहरण करणारा अजहर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधी विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तर राहाता येथे पोलिसांवर गोळीबार करणारे आरोपी सचिन ताके व अमित सांगळे हे सराईत गुन्हेगार आहेत. प्रसिद्ध व्यक्तीचे अपहरण अथवा पोलिसांवर हल्ला या घटना एका दिवसांपुरत्या मर्यादित राहत नाहीत तर त्याचा दीर्घकाळ समाजमनावर परिणाम होत असतो़. यातून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. इतर गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी होतो. यातून गुन्हेगारीच्या घटना वाढतात़ सराईत गुन्हेगारांनी पुन्हा-पुन्हा गंभीर गुन्हे करू नयेत, यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘गुन्हेगारी दत्तक योजना’ ही संकल्पना जिल्ह्यात राबविली होती. शर्मा गेल्यानंतर मात्र या योजनेचे काय झाले? हे पोलिसांनाच माहिती.

 हत्यारांचाचा धाक दाखवून भरदिवसा लुटमार गुन्हेगारी जगतात लुटमारीसाठी युपी, बिहारचे उदाहरणे दिली जातात. प्रत्यक्षात मात्र नगर शहर व परिसरात त्यापेक्षाही भयानक लुटमारीच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि़२४) नगर शहरात तिघा चोरट्यांनी दुपारी तीन वाजता कारचालकाचा पाठलाग करून हत्यारांचा धाक दाखवित मारहाण करत त्याच्याकडील पैशाची बॅग लंपास केली. शहर व परिसरात आठ दिवसांत किमान तीन ते चार अशा स्वरुपाच्या घटना घडत आहेत. अंगावर दागिने घालून आणि घरातून पैसे घेऊन नगर शहरात यावे की, नाही असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी