शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

कावडीने पाणी घालून जगविली आमराई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 10:46 IST

चांभुर्डी (ता. श्रीगोंदा) येथील समाजसेवक विजय बोºहाडे कावडीने पाणी घालून सव्वाशे झाडांची आमराई जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नानासाहेब जठारविसापूर : चांभुर्डी (ता. श्रीगोंदा) येथील समाजसेवक विजय बोºहाडे कावडीने पाणी घालून सव्वाशे झाडांची आमराई जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या भीषण दुष्काळी स्थितीतही या समाजसेवकाने पाण्याचे योग्य नियोजन करून आंब्याची झाडे जगविली आहेत.बोºहाडे हे मुळचे पुणे शहरातील रहिवासी होते. मात्र त्यांनी लहानपणी समाजसेवेचा ध्यास घेतला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कोणतीही नोकरी न करता सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विवाह केला नाही. त्यांनी घरदार सोडून कश्यप सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काही देणगीदारांची मदत घेऊन पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा खोल्या श्रमदान व लोकसहभागातून बांधून दिल्या आहेत. चांभुर्डी येथे सामाजिक काम सुरू करण्याचा आग्रह त्यांच्याशी पुणे येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या येथील काही ग्रामस्थांनी केला. त्यानंतर बोºहाडे यांनी चांभुर्डी येथे विसापूररोड लगत पाच एकर जमीन खरेदी केली. या ठिकाणी अनाथालय सुरू करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र शासनाच्या जाचक अटी व स्थानिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळविण्यात त्यांना यश आले नाही. यासाठी त्यांनी पाच खोल्या बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी ते एकटेच रहातात. तेथे त्यांनी केशर जातीचे १२० आंब्याची झाडे लावली आहेत. त्यांनी तेथे बोअरवेल घेऊन त्यावर हातपंप बसवला आहे. हातपंपामुळे पाण्याचा मर्यादित उपसा होतो. एवढ्या भयंकर दुष्काळी परिस्थितीही त्या हातपंपाला पाणी आहे. सध्या ते हे पाणी कावडीच्या साह्याने आंब्याच्या झाडांना घालत आहेत. पाणी टंचाई असल्याने गावातील लोकही या हातपंपाचे पाणी प्यायला घेऊन जातात.‘बोअरवेल’मध्ये विद्युत पंपाने पाण्याचा उपसा केल्यास पाण्याची पातळी खोलवर जाते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. हातपंपामुळे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करता येतो. या आंबा बागेत जी फळे येतील त्यांची विक्री न करता बागेत येऊन विसावा घेणारांना ही फळे विना मोबदला येथेच खाता येतील. मात्र बरोबर घेऊन जाता येणार नाहीत.-विजय बोºहाडे, समाजसेवक, चांभुर्डी, ता. श्रीगोंदा

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा