शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कावडीने पाणी घालून जगविली आमराई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 10:46 IST

चांभुर्डी (ता. श्रीगोंदा) येथील समाजसेवक विजय बोºहाडे कावडीने पाणी घालून सव्वाशे झाडांची आमराई जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नानासाहेब जठारविसापूर : चांभुर्डी (ता. श्रीगोंदा) येथील समाजसेवक विजय बोºहाडे कावडीने पाणी घालून सव्वाशे झाडांची आमराई जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या भीषण दुष्काळी स्थितीतही या समाजसेवकाने पाण्याचे योग्य नियोजन करून आंब्याची झाडे जगविली आहेत.बोºहाडे हे मुळचे पुणे शहरातील रहिवासी होते. मात्र त्यांनी लहानपणी समाजसेवेचा ध्यास घेतला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कोणतीही नोकरी न करता सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विवाह केला नाही. त्यांनी घरदार सोडून कश्यप सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काही देणगीदारांची मदत घेऊन पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा खोल्या श्रमदान व लोकसहभागातून बांधून दिल्या आहेत. चांभुर्डी येथे सामाजिक काम सुरू करण्याचा आग्रह त्यांच्याशी पुणे येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या येथील काही ग्रामस्थांनी केला. त्यानंतर बोºहाडे यांनी चांभुर्डी येथे विसापूररोड लगत पाच एकर जमीन खरेदी केली. या ठिकाणी अनाथालय सुरू करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र शासनाच्या जाचक अटी व स्थानिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळविण्यात त्यांना यश आले नाही. यासाठी त्यांनी पाच खोल्या बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी ते एकटेच रहातात. तेथे त्यांनी केशर जातीचे १२० आंब्याची झाडे लावली आहेत. त्यांनी तेथे बोअरवेल घेऊन त्यावर हातपंप बसवला आहे. हातपंपामुळे पाण्याचा मर्यादित उपसा होतो. एवढ्या भयंकर दुष्काळी परिस्थितीही त्या हातपंपाला पाणी आहे. सध्या ते हे पाणी कावडीच्या साह्याने आंब्याच्या झाडांना घालत आहेत. पाणी टंचाई असल्याने गावातील लोकही या हातपंपाचे पाणी प्यायला घेऊन जातात.‘बोअरवेल’मध्ये विद्युत पंपाने पाण्याचा उपसा केल्यास पाण्याची पातळी खोलवर जाते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. हातपंपामुळे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करता येतो. या आंबा बागेत जी फळे येतील त्यांची विक्री न करता बागेत येऊन विसावा घेणारांना ही फळे विना मोबदला येथेच खाता येतील. मात्र बरोबर घेऊन जाता येणार नाहीत.-विजय बोºहाडे, समाजसेवक, चांभुर्डी, ता. श्रीगोंदा

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा