शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सैनिकांच्या न्याय, हक्कांसाठी मोठा लढा उभारणार - अशोक चौधरी

By साहेबराव नरसाळे | Updated: April 11, 2023 16:10 IST

पेन्शनबाबत सरकारने अन्यायकारक आणि चुकीचे धोरण अवलंबविले आहे.

अहमदनगर : देशाच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात. वेळप्रसंगी बलिदान देतात. सैनिकांच्या त्याग व समर्पित वृत्तीमुळे देशातील नागरिक सुरक्षित आहेत. मात्र सैनिकांची उपेक्षा आणि अवहेलना होते. पेन्शनबाबत सरकारने अन्यायकारक आणि चुकीचे धोरण अवलंबविले आहे. पेन्शन हा प्रत्येक लोकसेवकाचा हक्क आहे. मात्र, तो हक्क डावलला जात असून सर्वच माजी सैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे याविरोधात मोठा लढा उभारणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले.

इसळक निंबळक येथे  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य प्रवक्ते एस. के. आठरे, संजय म्हस्के, कॅप्टन शेख, निंबळक विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास कोतकर, संदीप महाराज कळसे, निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर, इसळकच्या सरपंच छाया गेरंगे, निंबळक सेवा सोसायटीचे संचालक पोपट खामकर, शेतकरी संघटनेचे संदीप गेरंगे, भाऊसाहेब कोतकर, उद्योजक बाळासाहेब साठे, बी. एम. कोतकर, आदी उपस्थित होते.

त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष एकनाथ आडसुरे यांनी निंबळक शाखेचा गत वर्षातील कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले की, ‘पहिल्या वर्षात नियोजित उपक्रम आणि कार्यक्रम योग्य पद्धतीने आणि समाधानकारक प्रतिसादाने पार पडले आहेत. आगामी काळात आणखी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे.’ प्रवक्ते एस. के. आठरे यांनी गुणवंत विद्यार्थी आणि शहिदांच्या पत्नींचा ‘वीर नारी’ गौरव करण्याची सूचना मांडली. उपस्थितांनी एकमताने या सूचनेचे स्वागत केले.

कार्यक्रमासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे सचिव शिवाजी सोनवणे, मारुती ताकपेरे, शरद कोरडे, सुनील कोतकर, आबासाहेब कोतकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गेरंगे यांनी केले. आभार अशोक कोतकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर