शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

९८१ ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी

By admin | Updated: September 30, 2024 13:21 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येते. यात ग्रामपंचायतींचे दप्तर, कॅश बुक, मासिक सभा आणि ग्रामसभांचे इतिवृत्त, विकास योजनांचे कॅश बुक, कर वसुली, पाणीपट्टी वसुली, राज्य सरकार, जिल्हा परिषद यांच्याकडून देण्यात येणारा १५ टक्के मागासवर्गीयांचा निधी, १० टक्के महिला व बालकल्याण आणि ३ टक्के अपंगाचा निधी खर्च झाला की नाही, याची तपासणी यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ही तपासणी करण्यात आली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींची आकडेवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत महाजन यांनी दिली. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल महिनाभरात जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. या तपासणीत अनियमितता आढळणाऱ्या ग्रामपंचायतींवर करवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. येत्या महिनाअखेर पर्यंत जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)