शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

८८ लाखांचे नुकसान

By admin | Updated: August 27, 2014 23:09 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बुधवारी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे़ अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती़ खरिपाची पिकेही वाया गेली़ जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता़ संगमनेर शहरात सर्वाधिक १४६ मि़मी़ पाऊस झाला़ त्यामुळे संगमनेर शहरातील नाटकी पुनर्वसन वसाहत, अलकानगर, रेहमतनगर,नवीननगर रोड आदी परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी घुसले़ या परिसरातील सुमारे ४०५ कुटुंबीय बेघर झाले़ त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ नागरिकांच्या घरातील अन्न धान्याचे नुकसान झाले आहे़ घरातील कपडे,इतर संसार उपयोगी वस्तू, विद्युत उपकरणे, गॅस शेगडी आदी वस्तू पाण्यात वाहून गेल्या असून, जिल्हा प्रशासनाकडून याविषयीचा पंचनामा केला असून, त्यामध्ये अतिवृष्टीमुळे या परिसरातील नागरिकांचे ८७ लाख ९० हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या आपत्तीग्रस्तांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नाशिक येथील विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईविषयीचा प्रस्ताव सादर केला असून, अतिवृष्टीतील मदतीबाबत मार्गदर्शन मागविले आहे़ विभागीय आयुक्तांकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर संगमनेर शहरातील आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काय आहे अतिवृष्टीअतिवृष्टीमुळे सलग आठ दिवस घरात पाणी राहिले असेल किंवा घराची पडझड झाली असेल तर ही मदत देण्यात येते़ परंतु संगमनेर शहरात तसे झाले नसून, दुसऱ्या दिवशी पाणी वाहून गेले आहे़ त्यामुळे संगमनेर शहरातील नागरिकांना मदत द्यायची किंवा नाही,याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़