शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतात जाणारे ८३८ रस्ते अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:21 IST

अहमदनगर : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी व शेतातील मालवाहतूक करण्यासाठी रस्ते आवश्यक आहेत. मात्र शेतात जाणारे रस्ते अडविले आहेत, ...

अहमदनगर : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी व शेतातील मालवाहतूक करण्यासाठी रस्ते आवश्यक आहेत. मात्र शेतात जाणारे रस्ते अडविले आहेत, अशा जिल्ह्यात तब्बल ८३८ तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. रस्त्यांबाबत तहसील कार्यालयातील मामलेदार न्यायालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, मात्र त्याबाबत निर्णय झाला नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सप्तपदी अभियानामुळे ३१ मार्चपर्यंत शेतात जाणारे रस्ते मोकळे होणार आहेत.

शेतात जाणारे रस्ते अडविल्यास तहसील कार्यालयात मामलेदार न्यायालयात अर्ज दाखल करून न्याय मागता येतो. मात्र वर्षानुवर्षे ही प्रकरणे धूळखात आहेत. अनेक वर्षे भांडण-तंटे होतात, मात्र शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध होत नाही. सप्तपदी अभियानातील शेतात जाणारे रस्ते खुले करणे हे सातपैकी एक उद्दिष्ट आहे. ३१ मार्चपर्यंत या तक्रारी निकाली काढण्याचा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यासाठी प्रशासनाकडून एक पद्धत निश्चित असते. आता हीच प्रक्रिया सप्तपदी अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. रस्ते मोकळे करण्यासाठी ८ फेब्रुवारी ते ३१ मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. शेतात जाणारे रस्ते अडविल्याच्या जिल्ह्यात तब्बल ८३८ तक्रारी असून त्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती तहसीलदार (भुसुधार) सुनीता जऱ्हाड यांनी दिली.

----------------

कामकाजाचे असे राहील स्वरुप

दाव्यांबाबत नोटीस काढणे -८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी

वादी-प्रतिवादींना युक्तीवाद करण्यासाठी वेळ -२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी

स्थळ पाहणी व पंचनामा करणे-१ मार्च ते ९ मार्च

पक्षकारांना तोंडी युक्तीवादासाठी कालावधी-१० मार्च ते १६ मार्च

अंतिम निर्णय पारीत करणे-१७ मार्च ते २३ मार्च

आदेशाप्रमाणे प्रत्यक्ष रस्ता मोकळा करून देणे-२४ मार्च ते ३१ मार्च

---------------------

तालुकानिहाय अडलेले रस्ते

अहमदनगर-२२

कोपरगाव-२७

शेवगाव-६०

राहाता-१४

पारनेर-२४२

जामखेड-५७

राहुरी-४४

नेवासा-६८

अकोले-७२

श्रीरामपूर-४५

संगमनेर-६७

कर्जत-३१

पाथर्डी-१२

श्रीगोंदा-७७

एकूण-८३८

----------

मामलेदार कायदा काय आहे ?

शेतात जाण्या-येण्यासाठी शेजारचे काही जमिनमालक शेतकऱ्यांची अडवणूक करतात. बांधावरून जाण्यास अडवतात. शेतकरी जर तो रस्ता पूर्वापार वापरत असेल तर त्याची अडवणूक करता येत नाही. अशावेळी त्याला तहसील कार्यालयात मामलेदार न्यायालयात वादपत्र दाखल करता येते. रस्ता अडविणाऱ्याला प्रतिवादी करता येते. मामलेदार न्यायालय कायदा १९०६ मधील कलम ५ नुसार रस्ता पूर्ववत करून देण्याचा अधिकार आहे. जुना रस्ता नसेल तरी जमीन महसूल कायदा कलम १४३ नुसार कोणत्याही शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी तहसीलदारांकडे करता येते. वहिवाट कायदा १९८२ कलम १५ नुसार शेतात जाण्यासाठी रस्ता मिळविण्याचा अधिकार प्राप्त होतो. याबाबत दिवाणी न्यायालयातही दावा दाखल करता येतो. यानुसार रस्ता अडवू नये, यासाठी मनाई हुकुम प्राप्त करण्यासाठी दावा दाखल करता येतो. रस्ते अडविलेले जिल्ह्यात ८३८ प्रकरणे प्राप्त असून त्याचाच आता निकाल लागणार आहे.

--

फोटो- शेत रस्ता