शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

ग्रामपंचायतीसाठी ८२. ७३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींसाठी ८२. ७३ टक्के मतदान झाले असून, सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यात ८७ टक्के मतदान झाले आहे. येत्या ...

अहमदनगर: जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींसाठी ८२. ७३ टक्के मतदान झाले असून, सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यात ८७ टक्के मतदान झाले आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायतीसाठी ११ लाख ६७ हजार २५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७१ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावत मतदान केले. किरकोळ वादावादी वगळता मतदान शांतेत पार पडले. मतदान केंद्र परिसरात कार्यकऱ्यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही गावांमध्ये पोलिसांकडून बळाचा वापर केेला गेला. दोन गटांत वाद झाल्याने मतदान काही काळ थांबविल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. वाद निवळल्यानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आले.

ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये सकाळपासून उत्साह होता. गावापासून दूर वाड्या वस्त्यांवर असलेल्या मतदारांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामुळे मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडले होते. सकाळी पुरुष मतदारांची संख्या मतदान केंद्रांवर अधिक होती. दुपारनंतर घरकाम संपून महिला मतदानासाठी बाहेर पडल्या. शेवगाव तालुक्यातील घोटण येथे सयंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार सलमा सय्यद यांनी मतदारांना मर्जीप्रमाणे मतदान करू दिले नाही, असा आरोप करत फेर मतदान घ्यावे, अशी मागणी केंद्र प्रमुखांकडे करण्यात आली. तसेच न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा देण्यात आला. जामखेड तालुक्यातील नायगाव डोंणगाव येथे सकाळी मतदान सुरू होताच मतदान यंत्रणात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे काही काळ मतदान ठप्प होते.

...

शेतीकामाला एक दिवस स्वयंघोषित सुट्टी

सध्या सर्वत्र शेतीची जोरात कामे सुरू आहेत; परंतु गावातील मतदान असल्याने शेती कामाला एक दिवस सुटी देण्यात आली. शेतीची कामे बंद ठेवून मतदारांनी उत्साहात मतदान केले. त्यात मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा असल्याने मतदानासाठी वेळ लागला.

...

अनेक मतदारांकडे एकही पुरावा नाही

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २१ पुरावे ग्राह्य धरले जातात; मात्र अनेक मतदारांकडे एकही पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांना मतदान करू दिले नाही. यावरून काही गावांत केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले.

...

मास्क सोशल डिस्टन्सिंगला फाटा

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी धोका कायम आहे. त्यामुळे शासनाने मतदान केंद्रांवर मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, याबाबतचे आदेश दिले होते; परंतु मतदान केंद्रांवर विना मास्क मतदार मतदानासाठी येत होते. मतदान कक्षातही मतदारांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली, तसेच मतदान केंद्राबाहेरही कमालीची गर्दी होती. त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

...

प्रशासकीय यंत्रणेकडून पुरुष मतदारांना प्राधान्य

मतदान केंद्रावर गोंधळ होऊ नये, यासाठी पुरुष मतदारांना मतदान करून बाहेर काढले जात होते. तोपर्यंत महिला मतदारांना थांबविण्यास सांगितले जात होते. महिला रांगेत येऊन थांबत होत्या; परंतु त्यांना मतदान कक्षात सोडले जात नव्हते. त्यामुळे महिलांना तासंतास उभे राहावे लागत होते.

...

...