अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर असून, रविवारी ७१८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ७०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २० हजार ७५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३२ टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६०१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९१ आणि अँटिजन चाचणीत २२१ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०१, जामखेड १५, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १७, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०६, राहुरी ०१, संगमनेर ९५, शेवगाव ०३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले २४, जामखेड ०२, कर्जत १४, कोपरगाव २३, नगर ग्रा.०८, नेवासा १३, पारनेर २०, पाथर्डी ०४, राहाता ३८, राहुरी १२, संगमनेर ६५, शेवगाव १३, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १४ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत २२१ जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा ०१, अकोले ३९, जामखेड ०१, कर्जत १९, कोपरगाव १७, नगर ग्रा. ०५, नेवासा ०८, पारनेर ३२, पाथर्डी १०, राहाता १६, राहुरी १३, संगमनेर २४, शेवगाव १५, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३६, अकोले ८४, जामखेड १४, कर्जत १६, कोपरगाव ०४, नगर ग्रा. ३४, नेवासा २९, पारनेर ८६, पाथर्डी ७७, राहाता ४३, राहुरी २३, संगमनेर १५८, शेवगाव २७, श्रीगोंदा ४७, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.