शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

७१ पैंकी १२ कोटीच खर्च

By admin | Updated: June 26, 2016 00:37 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी कार्यक्रमातून वर्षभरात ८७ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी कार्यक्रमातून वर्षभरात ८७ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. जिल्ह्यात दुष्काळस्थिती असताना रोहयोवरील मजुरांच्या संख्येत अपेक्षित वाढ झालेली दिसली नाही. वर्षभरात रोहयो प्रशासनाने ७१ कोटी ७९ लाख रुपयांचे नियोजन केले होते. त्यापैकी केवळ १२ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च विकास कामावर करणे प्रशासनाला शक्य झाले.अलीकडच्या काही वर्षात रोहयोचे बदलेले नियम आणि अल्प मजुरीमुळे रोहयोवर काम करण्याकडे मजुरांचा कल कमी असल्याचे दिसून येत आहे. रोहयोच्या कामासाठी जॉब कार्डवर नोंदणी करणे, त्यानंतर कामाचे मस्टर तयार करणे, पगारासाठी बँक अथवा पोस्टात खाते उघडणे आदी किचकट नियमामुळे मजुरांची बहुतांशी वेळा रोहयोकडे पाठ असल्याचे चित्र आहे. यासह आता बँक खात्यासाठी आधार कार्ड लिंकिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत ६ लाखाहून अधिक मजूर आहेत. कार्यरत असणारे फक्त १ लाख ४१ हजार मजूर आहेत. रोहयोत २ हजार ७२८ अपूर्ण राहिलेली कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आलेले आहेत. मात्र विहिरीची १ हजार ६४७ कामे अपूर्ण राहिलेली आहेत. अपूर्ण असणारी ही कामे पूर्ण करण्यासाठी सरकार पातळीवरून मोठा पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या २५४ ग्रामपंचायतीमध्ये ५६७ कामे सुरू असून या ठिकाणी ७ हजार ७७८ मजुरांची उपस्थिती आहे. महसूल विभागाच्या यंत्रणेमार्फत साधारण १० हजारांच्या जवळपास मजूर रोहयोवर कार्यरत आहेत. रोहयोतून वैयक्तिक विहिरीची कामे, गाळ काढणे, शोषखड्डे, इंदिरा आवास घरकूल, रस्ते, कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे, विहीर पुनर्भरण, विखुरलेली वृक्ष लागवड, फळबाग लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, जनावरांचा गोठा लागवड यांची कामे सुरू आहेत. (प्रतिनिधी)