शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

नगर जिल्ह्यात ६४ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 15:14 IST

बुधवारपासून जिल्ह्यात सुरू होणा-या बारावी परीक्षेसासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ९३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६४ हजार ३४६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

अहमदनगर : बुधवारपासून जिल्ह्यात सुरू होणा-या बारावी परीक्षेसासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ९३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६४ हजार ३४६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या नियंत्रणाखाली सुरुवातीला बारावी आणि त्यानंतर दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेला बुधवारी दुपारी ११ वाजता प्रारंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने ९३ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे़ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा जिल्हास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी दोन पोलीस कर्मचा-यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची केंद्रावरील परिस्थितीवर नजर राहणार आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात २१ परिरक्षक केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रातून प्रश्नपत्रिकांचे वाटप होणार आहे. यापूर्वी बंदी पेटीतून प्रश्नपत्रिका परिरक्षक केंद्रावर पोहोचत केल्या जात असे. तेथून त्या केंद्रांवर पोहोचत करण्यात येत होत्या. परंतु, चालूवर्षी २५ प्रश्नपत्रिकांचे बंद पाकीट मिळणार आहे. ते वर्गात विद्यार्थ्यांसमोर उघडले जाणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीला आळा बसेल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

केंद्र परिसरात मोबाईल बंदी

जिल्ह्यातील ९३ केंद्रांवर बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत़ या केंद्रांवर विद्यार्थ्यांसह उपकेंद्र संचालक, पर्यवेक्षक उपपर्यवेक्षक आदी कर्मचा-यांचे मोबाईलही जमा केरून घेतले जाणार आहेत. केंद्र संचालक वगळता इतरांचे मोबाईल जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सहा भरारी पथके

क्षेत्रफळाने जिल्हा मोठा असल्याने दहावी व बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि निरंतर शिक्षणाधिका-यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. महापालिका, उपशिक्षण अधिकारी आणि शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.

साडेदहानंतर केंद्रांवर बंदी

बारावी परीक्षा केंद्रांवर दुपारी १०़३० वाजेनंतर बंद घालण्यात आली आहे. परीक्षा ११ वाजता सुरू होणार असली तरी साडेदहा वाजताच केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणा-या विद्यार्थ्यांना केंद्र संचालकांची परवानगी घ्यावी लागेल.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर