शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्केची दडपशाही

By admin | Updated: July 10, 2014 00:31 IST

श्रीरामपूर : राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील खंडकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करताना श्रीरामपूर शहरालगत जमिनी असणारांना शहराजवळ फक्त ५० टक्के जमिनी घेण्यासाठी महसूल यंत्रणेच्या

श्रीरामपूर : राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील खंडकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करताना श्रीरामपूर शहरालगत जमिनी असणारांना शहराजवळ फक्त ५० टक्के जमिनी घेण्यासाठी महसूल यंत्रणेच्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांनी दडपशाही सुरू केली आहे. आमच्या आहे त्याच ठिकाणच्या जमिनी त्याचठिकाणी १०० टक्के मिळाव्यात, अशी खंडकऱ्यांची मागणी आहे. खंडकरी जमीन वाटपाच्या शासन आदेशात मूळ खंडकऱ्यांच्या जमिनी प्राधान्याने त्यांनाच वाटप करावे, असे म्हटले आहे. तर प्रत्यक्षात श्रीरामपूर लगतच्या पैसे पिकविणाऱ्या महागड्या जमिनींवर पुढाऱ्यांचा डोळा आहे. त्यातूनच शहरालगत शेतजमिनी असणाऱ्या खंडकऱ्यांना ५० टक्के जमीन शहरालगत तर ५० टक्के इतरत्र देण्याचा नियमबाह्य निर्णय एका बैठकीत घेण्यात आला. खंडकऱ्यांना त्यांच्या जमिनी प्राधान्याने देण्याच्या शासन आदेशाला हा निर्णय छेद देणारा आहे. जमीन वाटपाचे कामकाज पाहणारे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या श्रीरामपूरमधील पहिल्याच बैठकीत खंडकऱ्यांनी ५० टक्के वाटपास विरोधही केला. तर शहरालगतच्या जमिनींच्या बाजारभावाने येणाऱ्या कोट्यवधी रूपयांच्या किमतीचा हिशोब करणाऱ्या काहीजणांनी उतावळेपणाने संमतीही दाखविली. पण मूळ खंडकऱ्यांची जमीन त्यांनाच प्राधान्याने देण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले असतानाही राजकीय हस्तक्षेपातून फिफ्टी फिफ्टीचा तोडगा काढून ५० टक्के क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी खंडकऱ्यांवर दबाव आणला जात आहे.त्यानुसार श्रीरामपूर व दत्तनगर येथील खंडकऱ्यांना ४ जुलैच्या पत्राने ७ दिवसात ५० क्षेत्राबरोबर उर्वरित ५० टक्के क्षेत्र मागणीबाबत अर्ज सादर न केल्यास आपणास उर्वरित ५० टक्के क्षेत्र वाटपासाठी शिल्लक असलेल्या उक्कलगाव, निपाणी वडगाव, शिरसगाव येथील क्षेत्र नेमून देऊन जमीन वाटप प्रक्रिया एकतर्फी पूर्ण करण्यात येईल, असा दमच तहसीलदारांच्या नावाने दिलेल्या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.शेती महामंडळाच्या टिळकनगर मळ्यातील मौजे श्रीरामपूर व दत्तनगर येथील माजी खंडकरी अथवा कायदेशीर वारस यांना जमीन वाटप करण्याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेतली. त्यात या खंडकऱ्यांना ५० टक्के क्षेत्र सोडून बाकी गावात शिल्लक राहिलेले क्षेत्र पाहणी करून अर्ज भरण्याचा निर्णय झाल्याचे नोटिसीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)आमच्या वाडवडिलांची जमीन शेती महामंडळाकडे खंडाने दिलेली होती. आता महामंडळाच्या ताब्यातील आमच्या जमीन परत देताना आमच्या जमिनी आम्हाला १०० टक्के परत करा. आमच्या चांगल्या दर्जाच्या, चांगल्या किंमतीच्या जमिनी ठेवून आम्हाला दुसरीकडे निकृष्ट दर्जाच्या जमिनी नको आहेत.- संतोष भीमराज मोरगे, खंडकरी वारस, श्रीरामपूर.