शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

एकाच दिवसात ४५ अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. गुरुवारी दिवसभरात नगर शहरात ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली. ...

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. गुरुवारी दिवसभरात नगर शहरात ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. एकाच दिवसात एवढे अंत्यविधी होण्याची ही आजवरची पहिलीच घटना आहे.

जिल्ह्यात दररोज दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. शुक्रवारी दिवसभर २ हजार २२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्ण अहमदनगर शहरात हलविले जात आहेत. त्यातील मृतांवरही नगर शहरातच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

बुधवारी जिल्ह्यात १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा आकडा गुरुवारी ४५ वर गेला. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. येथे एकच अमरधाम अमरधाम आहे. गुरुवारी रात्री दीड वाजेपर्यंत अमरधाममध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरधाममध्ये दोन विद्युत दाहिन्या आहेत. तेथे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागतो. गुरुवारी दिवसभरात या दाहिन्यांमध्ये २० अंत्यसंस्कार झाले. मृतांचा आकडा मोठा असल्याने रात्री २२ अंत्यसंस्कार सामूहिकपणे ओट्यावर करण्यात आले. त्यासाठी अंत्यसंस्कार सहायक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. अंत्यविधीवेळी नातेवाइकांना प्रवेश दिला जात नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. गुरुवारी रात्री मृतदेह घेऊन येणाऱ्या शववाहिकांची अक्षरश: रांग लागली होती. शुक्रवारीही सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता. रात्री हा आकडा आणखी वाढेल, असे सांगण्यात आले.

....

एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारपणे दीड तास लागतो. तोपर्यंत आणखी सहा मृतदेह आणून ठेवलेले असतात. खासगी रुग्णालयातील शववाहिकेतूनही मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात.

......

मनपाची नवीन शववाहिका अडकली लालफितीत

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गत एप्रिल महिन्यात एका दिवसात कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी एकाच शववाहिकेतून पाच ते सहा मृतदेहांची वाहतूक होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे नगर मनपाने अन्य एक शववाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला; परंतु वर्ष उलटूनही नवीन शववाहिका खरेदी केलेली नाही. आता तातडीने दोन शववाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा आदेश दिला असल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

..........

तीन मंत्री असताना मृतदेहांवर हा प्रसंग -विखे

जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाच दिवशी ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यातील एकाही मंत्र्याने कोरोनाच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.