शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

चार महिन्यांत जिल्ह्यात ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 24, 2016 23:15 IST

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी सरकारी मदतीस पात्र ठरले तर ११ आत्महत्याग्रस्तांच्या फेरचौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत़ सर्वाधिक आत्महत्या गेल्या चार महिन्यांत झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे़गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे़ सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे, ते अद्याप थांबलेले नाही़ मागील वर्षी ११७ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले़ चालू वर्षात कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला़ त्यावर केलेल्या गुंतवणुकीवर पाणी फिरले़ बळीराजा कर्जबाजारी झाला आहे़ त्यामुळे दररोजचा खर्च भागविणेही कठीण होऊन बसले़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जानेवारी, फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये ४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे़ जिल्ह्यात कधी नव्हे ती भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ खरीप व रब्बी हंगामातील पैसेवारीच्या अहवालावर नजर टाकल्यास संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे प्रकर्षाने जाणवते़ विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यात यंदा बिकट स्थिती निर्माण झाली़ धरणांत पाणी असून, ते शेतीला मिळाले नाही़ मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त झाली़ दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातूनही यंदा पाणी मिळाले नाही़ त्यामुळे लाभक्षेत्रातील फळबागा झळून खाक झाल्या़ त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट ओढावले़ यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून आत्महत्यासारखा विखारी मार्ग शेतकऱ्यांनी अवलंबिला़ घरातील कर्ता माणून न राहिल्याने संसार उघड्यावर आले असून, प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना हाती घेतल्या गेल्या नाहीत, हे विशेष़ (प्रतिनिधी)३६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यागेल्या २००३ ते एप्रिल २०१६ या काळात जिल्ह्यातील ३६५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी ४५ शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांत आत्महत्या केल्या असून, त्यापैकी २५ शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे़ त्यांच्या नातेवाईकांना सरकारी मदतही वितरीत करण्यात आली आहे़