शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

चार महिन्यांत जिल्ह्यात ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 24, 2016 23:15 IST

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी सरकारी मदतीस पात्र ठरले तर ११ आत्महत्याग्रस्तांच्या फेरचौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत़ सर्वाधिक आत्महत्या गेल्या चार महिन्यांत झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे़गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे़ सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे, ते अद्याप थांबलेले नाही़ मागील वर्षी ११७ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले़ चालू वर्षात कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला़ त्यावर केलेल्या गुंतवणुकीवर पाणी फिरले़ बळीराजा कर्जबाजारी झाला आहे़ त्यामुळे दररोजचा खर्च भागविणेही कठीण होऊन बसले़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जानेवारी, फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये ४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे़ जिल्ह्यात कधी नव्हे ती भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ खरीप व रब्बी हंगामातील पैसेवारीच्या अहवालावर नजर टाकल्यास संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे प्रकर्षाने जाणवते़ विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यात यंदा बिकट स्थिती निर्माण झाली़ धरणांत पाणी असून, ते शेतीला मिळाले नाही़ मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त झाली़ दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातूनही यंदा पाणी मिळाले नाही़ त्यामुळे लाभक्षेत्रातील फळबागा झळून खाक झाल्या़ त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट ओढावले़ यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून आत्महत्यासारखा विखारी मार्ग शेतकऱ्यांनी अवलंबिला़ घरातील कर्ता माणून न राहिल्याने संसार उघड्यावर आले असून, प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना हाती घेतल्या गेल्या नाहीत, हे विशेष़ (प्रतिनिधी)३६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यागेल्या २००३ ते एप्रिल २०१६ या काळात जिल्ह्यातील ३६५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी ४५ शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांत आत्महत्या केल्या असून, त्यापैकी २५ शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे़ त्यांच्या नातेवाईकांना सरकारी मदतही वितरीत करण्यात आली आहे़