शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

एकात्मिक गृहनिर्माणचे ४ कोटी गेले परत; कोपरगावात नव्याने ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:05 IST

२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.

रियाज सय्यदकोपरगाव : राज्य शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम नगरपालिका हद्दीत २०१५ पर्यंत वेळेमध्ये सुरू होऊ न शकल्याने सुमारे ४ कोटी रूपयांचा निधी परत गेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरात ३ हजार १०८ घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे.सन २०१०-११ साली एकात्मिक गृहनिर्माण योजनेच्या अनुषंगाने पालिकेला ४ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. तत्कालिन पालिका पदाधिकाºयांनी खडकी परिसरात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम २-३ वर्षे रखडले. पुढे २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.२०१६-१७ पासून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नगरपालिकेस ३ हजार १०८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजेच ३०८ घरांची उभारणी केली जाणार आहे. महेंद्रकुमार दवे अ‍ॅण्ड असोसिएट्स या ठेकेदारामार्फत शहरातील २ हजार घरांचे सर्व्हेक्षण झाले आहे. २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी लाभार्र्थींनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने पालिकेत संपर्क साधावा.-शिल्पा दरेकर, मुख्याधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान