शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीपर्यंतचे ३५ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार ५०४ विद्यार्थ्यांना पुढच्या ...

शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार ५०४ विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे विद्यार्थी आनंदी असले, तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. विद्यार्थ्याचा अभ्यास बुडाल्याची, तसेच शिक्षणाची गोडी कमी होऊ लागल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत.

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मागील वर्षी २३ मार्च रोजी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने जानेवारी, २०२१ मध्ये शाळांतील घंटा वाजली होती. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच, सुरळीतपणे सुरू झालेले वर्ग मार्च अखेरीस पुन्हा बंद करावे लागले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी ( दि.३ ) १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे.

सलग दुसऱ्याही वर्षी परीक्षा रद्द करून पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने, पालकांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गत दोन वर्षांत बुडालेला अभ्यास, शाळेची कमी झालेली गोडी, ओढ, अभ्यासाचा सराव व लिखाणाची सवय कमी होणे आदी कारणांमुळे आगामी काळात शिक्षणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

------------

शैक्षणिक धोरणाप्रमाणे पहिली ते आठवीपर्यंत नापास करायचे नाही, उपस्थितीनुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला. फरक एवढाच आहे की, पूर्वी शाळेत जाऊन विद्यार्थी ज्ञान मिळवित होता, आता घरी बसून अभ्यास न करता पास होत आहे. भविष्यात मोठ्या समस्येला या विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागेल. कारण पुढील काळात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देताना या दोन वर्षांतील बेसिक ज्ञानापासून ही मुले वंचित राहतील. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना या समस्येला तोंड द्यावे लागेल. शहरातील पालक आपल्या मुलांना घरी शिकवतात. मात्र, ग्रामीण भागातील पालकांना यासाठी वेळ नाही किंवा तो जागरूक नाही. एकंदरीत हे विद्यार्थी काही प्रमाणात ज्ञानापासून वंचित राहतील.

- दिलीप फलके, माजी प्राचार्य

----------

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला मिळाला आहे. शाळांनी संपूर्ण वर्षभर ऑनलाइन, ऑफलाइन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं होते. आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरं तर या मुलांचे वर्षभराचं मूल्यमापन होणे तेवढेच गरजेचे होते. विद्यार्थ्यांना घरपोच प्रश्नपत्रिका देऊन अथवा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्यायला हवी होती. सलग दोन वर्षे विनापरीक्षा पुढील वर्गात गेल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाविषयी गांभीर्य कमी होण्याची शक्यता आहे. शाळा बंद असल्याने मुलांची आभास, लिखाणाची सवय मोडली आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर दुरगामी परिणाम होऊ शकतो.

- महेश फलके, पालक

------ ------

तालुक्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी

पहिली ४,०९७

दुसरी ४,२७८

तिसरी ४,७०८

चौथी ४,५५८

पाचवी ४,४५६

सहावी ४,४२३

सातवी ४,४५८

आठवी ४,५२६

एकूण ३५,५०४

..............

मुली - १९,२९५

मुले - १६,२०९