शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

पहिली ते आठवीपर्यंतचे ३५ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार ५०४ विद्यार्थ्यांना पुढच्या ...

शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार ५०४ विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे विद्यार्थी आनंदी असले, तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. विद्यार्थ्याचा अभ्यास बुडाल्याची, तसेच शिक्षणाची गोडी कमी होऊ लागल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत.

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मागील वर्षी २३ मार्च रोजी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने जानेवारी, २०२१ मध्ये शाळांतील घंटा वाजली होती. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच, सुरळीतपणे सुरू झालेले वर्ग मार्च अखेरीस पुन्हा बंद करावे लागले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी ( दि.३ ) १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे.

सलग दुसऱ्याही वर्षी परीक्षा रद्द करून पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने, पालकांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गत दोन वर्षांत बुडालेला अभ्यास, शाळेची कमी झालेली गोडी, ओढ, अभ्यासाचा सराव व लिखाणाची सवय कमी होणे आदी कारणांमुळे आगामी काळात शिक्षणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

------------

शैक्षणिक धोरणाप्रमाणे पहिली ते आठवीपर्यंत नापास करायचे नाही, उपस्थितीनुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला. फरक एवढाच आहे की, पूर्वी शाळेत जाऊन विद्यार्थी ज्ञान मिळवित होता, आता घरी बसून अभ्यास न करता पास होत आहे. भविष्यात मोठ्या समस्येला या विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागेल. कारण पुढील काळात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देताना या दोन वर्षांतील बेसिक ज्ञानापासून ही मुले वंचित राहतील. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना या समस्येला तोंड द्यावे लागेल. शहरातील पालक आपल्या मुलांना घरी शिकवतात. मात्र, ग्रामीण भागातील पालकांना यासाठी वेळ नाही किंवा तो जागरूक नाही. एकंदरीत हे विद्यार्थी काही प्रमाणात ज्ञानापासून वंचित राहतील.

- दिलीप फलके, माजी प्राचार्य

----------

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला मिळाला आहे. शाळांनी संपूर्ण वर्षभर ऑनलाइन, ऑफलाइन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं होते. आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरं तर या मुलांचे वर्षभराचं मूल्यमापन होणे तेवढेच गरजेचे होते. विद्यार्थ्यांना घरपोच प्रश्नपत्रिका देऊन अथवा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्यायला हवी होती. सलग दोन वर्षे विनापरीक्षा पुढील वर्गात गेल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाविषयी गांभीर्य कमी होण्याची शक्यता आहे. शाळा बंद असल्याने मुलांची आभास, लिखाणाची सवय मोडली आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर दुरगामी परिणाम होऊ शकतो.

- महेश फलके, पालक

------ ------

तालुक्यातील विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी

पहिली ४,०९७

दुसरी ४,२७८

तिसरी ४,७०८

चौथी ४,५५८

पाचवी ४,४५६

सहावी ४,४२३

सातवी ४,४५८

आठवी ४,५२६

एकूण ३५,५०४

..............

मुली - १९,२९५

मुले - १६,२०९