शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

महाराष्ट्रातील ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार; कोपरगावात पुणे धर्मादाय आयुक्तांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:28 IST

पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली.

कोपरगाव : पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली.कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व लायन्स मुकबधीर विद्यालयास कचरे यांनी बुधवारी भेट दिली. ते म्हणाले, पुणे विभागातील अहमदनगर, पुणे, सोलापुर व सातारा या चारही जिल्ह्यांमध्ये २९ हजार निष्क्रीय संस्था आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील १० हजार संस्थांचा समावेश आहे. सर्व संस्थांचा मुळ अभिलेख तपासण्यात आला आहे. त्यात धर्मदाय कायद्यान्वये नोंदणी झाल्यापासून हिशोब पत्रके व विश्वस्त बदलाचे अर्ज सादर केलेली नाहीत. अशा संस्थांना नोटीसा देण्यात आल्या असुन चारही जिल्ह्यातील २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील १६७ संस्था निष्क्रीय करण्यात आल्याचे कचरे यांनी सांगितले. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे व विश्वस्त अशोक खांबेकर यांनी कचरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व सदस्य संदीप रोहमारे उपस्थित होते.

पुणे विभागातील निष्क्रीय संस्था

पुणे जिल्हा (१० हजार ५९), नगर जिल्हा (१० हजार ५००), सोलापूर जिल्हा (१ हजार १०६) व सातारा जिल्हा (७ हजार ५४४) अशा एकूण २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द होणार.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव