शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

महाराष्ट्रातील ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार; कोपरगावात पुणे धर्मादाय आयुक्तांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:28 IST

पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली.

कोपरगाव : पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली.कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व लायन्स मुकबधीर विद्यालयास कचरे यांनी बुधवारी भेट दिली. ते म्हणाले, पुणे विभागातील अहमदनगर, पुणे, सोलापुर व सातारा या चारही जिल्ह्यांमध्ये २९ हजार निष्क्रीय संस्था आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील १० हजार संस्थांचा समावेश आहे. सर्व संस्थांचा मुळ अभिलेख तपासण्यात आला आहे. त्यात धर्मदाय कायद्यान्वये नोंदणी झाल्यापासून हिशोब पत्रके व विश्वस्त बदलाचे अर्ज सादर केलेली नाहीत. अशा संस्थांना नोटीसा देण्यात आल्या असुन चारही जिल्ह्यातील २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील १६७ संस्था निष्क्रीय करण्यात आल्याचे कचरे यांनी सांगितले. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे व विश्वस्त अशोक खांबेकर यांनी कचरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व सदस्य संदीप रोहमारे उपस्थित होते.

पुणे विभागातील निष्क्रीय संस्था

पुणे जिल्हा (१० हजार ५९), नगर जिल्हा (१० हजार ५००), सोलापूर जिल्हा (१ हजार १०६) व सातारा जिल्हा (७ हजार ५४४) अशा एकूण २९ हजार २०९ संस्थांची नोंदणी रद्द होणार.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव