शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

२८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:06 IST

राज्य सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली. मात्र लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद आहे. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जैसे थे असून, २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहे. कोरोनाच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी भांडवल आणायचे कोठून? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. 

अहमदनगर : राज्य सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली. मात्र लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद आहे. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जैसे थे असून, २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहे. कोरोनाच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी भांडवल आणायचे कोठून? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. राज्य सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या. मात्र तिसरी यादी प्रसिध्द करण्यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे ही यादी सरकारने थेट बँकांना पाठविली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला जिल्ह्यातील २६ हजार पात्र शेतक-यांची यादी प्राप्त झाली आहे. मागील दोन याद्यामध्ये नावे असलेल्या दोन हजार शेतक-यांना तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीस पात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण केले जाते. शेतक-यांनी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा दिल्यानंतर शेतक-यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा होते. ही रक्कम  जमा झाल्यानंतर शेतकरी कर्जमुक्त होऊन पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र होतात. परंतु, सध्या लॉकडाऊन असल्याने सेतू केंद्रांवर गर्दी होईल, या भितीने सरकारने आधार प्रामाणिकरणाचे पोर्टल बंद केले आहे. त्यामुळे तिस-या यादीतील पात्र शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण रखडले असून, हे शेतकरी नवीन कर्ज घेण्यास अपात्र ठरले आहेत. खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतीची मशागत, खते बी-बियाणे, यासाठी शेतक-यांना वेळेवर कर्ज मिळणे जरुरीचे आहे. परंतु, कर्जमाफीची अंमलबजावणी सध्या बंद आहे. त्यामुळे मागील कर्जाचा डोंगर जैसे थे असल्याने बँका शेतक-यांना दारात उभ्या करत नाहीत. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे़ सर्व व्यवहार बंद आहेत. बँका एकमेव पर्याय आहे. पण, कर्जमाफीची प्रक्रिया रखडल्याने बँकाही कर्ज देऊ शकत नसल्याने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी जिल्ह्यातून पुढे येत आहे.आतापर्यंत ५० टक्केच कर्ज पुरवठाएप्रिलअखेर जिल्हा सहकारी बँकेकडून ५०० कोटीहून अधिक खरीप पीक कर्जाचे वाटप होत असते. यंदा कर्जमाफीमुळे पात्र शेतक-यांची संख्या वाढली. पण, लॉकडाऊन आणि रखडलेल्या कर्जमाफीमुळे आतापर्यंत जिल्हा सहकारी बँकेकडून २५५ कोटींचेच कर्ज वाटप झाले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी