शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जिल्ह्यात २२३ संभाव्य पूरग्रस्त गावे

By admin | Updated: June 11, 2016 23:50 IST

अहमदनगर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २०१६-१७ चा साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरपरिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे

अहमदनगर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २०१६-१७ चा साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरपरिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये २२३ गावे संभाव्य पूरग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यासह पावसाळ्यात गेल्या तीन वर्षात ज्या गावात साथजन्य आजारांचा उद्रेक झाला होता, अशा ९ गावांवर यंदा विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी साथ नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरपरिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करते. या आराखड्यानुसार पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी तालुकानिहाय आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आली आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहे. तालुकानिहाय यात्रा उत्सव, धार्मिक क्षेत्र असणाऱ्या गावांची यादी आराखड्यात निश्चित करण्यात आली आहे. आराखड्यातील नियोजनानुसार पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यानंतर ग्रामीण भागात काय उपाययोजना करायच्या याची निश्चिती करण्यात आली आहे.पावसाळ्यात व पावसाळ््यानंतर जलजन्यव कीटकजन्य आजारांची साथ निर्माण होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होतात. यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणुजन्य काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. पुराच्या पाण्याचा संपर्क आल्याने लेप्टोस्पॉयरॉसिस आजार उद्भवतो. तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही आढळतो. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पावसाळ्यात साथ जलजन्य व कीटकजन्य साथी उद्भवू नयेत व साथ आल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. (प्रतिनिधी)आरोग्य विभागाचा सल्लाउघड्यावरील अन्नपदार्थ, कापलेली फळे खाऊ नका, उघड्यावरील व माशा असलेले अन्न खाऊ नका, शिळे अन्नपदार्थ खाऊ नका, उघड्यावर शौचास बसू नका, अस्वच्छ व असुरक्षित पाणी पिऊ नका, पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे तसेच पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करावा, आरोग्य तक्रार असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.पूरग्रस्त गावे अशी...पारनेर १४, कोपरगाव २१, जामखेड ३, शेवगाव १, नगर ९, अकोले १४, संगमनेर १७, राहाता ५, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर २७, राहुरी ३९, नेवासा २७, कर्जत २३ यांचा समावेश आहे. ही सर्व गावे मुळा, प्रवरा, गोदावरी, भिमा आणि घोड आदी नद्यांच्या काठावर वसलेली आहेत.गेल्या वर्षी शेवगाव तालुक्यातील आधोडी, ढोरसडे, राहुरीमधील टाकळीमियाँ, पाथर्डीतील मोहटे, जिरेवाडी, अकोले तालुक्यातील काळकाई कारवाडी, टाहाकारी, नगरमधील पारेवाडी, वाळकी, श्रीरामपुरातील लाडगाव, राहाता तालुक्यातील पुणतांबा, पारनेर पिंप्री जलसेन, संगमनेमधील आश्वी बुद्रूक या गावात साथजन्य आजारांचा उद्रेक झाला होता.