शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२० हजार विद्यार्थ्यांनी दिली घरबसल्या शिष्यवृत्तीची सराव परीक्षा

By चंद्रकांत शेळके | Updated: October 2, 2023 17:52 IST

शनिवारी रात्री साडेसात ते नऊ व रविवारी सकाळी ८ ते साडेनऊ या वेळेत घेतली परीक्षा

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: पुढील शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षेची पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, म्हणून शिक्षण विभागाने पुढाकार घेत रविवारी ऑनलाइन शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली. तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी घरी बसून पालकांच्या मोबाइलवर ही परीक्षा दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये अहमदनगर जि.प. शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षेचे वार्षिक वेळापत्रक तयार करून दिले असून त्याप्रमाणे घटकनिहाय मासिक अध्यापन करायचे आहे. तसेच महिन्यात शिकविलेले घटक विद्यार्थ्यांना कितपत समजले यासाठी फक्त शिकविलेल्या घटकांवर आधारित ऑनलाइन चाचणी घेऊन त्यांचे मूल्यमापन करण्याची संकल्पना भास्कर पाटील यांनी मांडली.

त्यानुसार विद्यार्थ्यांचे पालक घरी असताना पालकांच्या मोबाइलवरून विद्यार्थ्यांना चाचणी सोडविता यावी, यासाठी शनिवार (दि. ३०) व रविवार (दि. १) असे सुटीचे दिवस निवडले. शनिवारी रात्री साडेसात ते नऊ व रविवारी सकाळी ८ ते साडेनऊ या वेळेत जिल्ह्यातील २० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये इयत्ता पाचवी मराठी माध्यमाच्या १२ हजार ६३०, उर्दू माध्यमाच्या ९००, तसेच इयत्ता आठवीच्या ६ हजार ५४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेचा निकाल शिक्षण विभागाच्या https://www.eduprimaryanagar.in/p/blog-page_85.html या संकेतस्थळावर घोषित केला असून,विद्यार्थी, पालक, शिक्षक आपापल्या निकालाची पडताळणी करू शकतात.

परीक्षा यशस्वितेसाठी शिष्यवृत्ती विभागप्रमुख विस्तार अधिकारी मनीषा कुलट, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, तंत्रस्नेही शिक्षक बाबासाहेब पवार, मिलिंद जमादार, तसेच जिल्हा आयटी समन्वयक रवी भापकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सरावासाठी संकेतस्थळावर ३० सराव चाचण्या

ऑनलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासास चालना देणारी अहमदनगर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. जिल्हा परिषद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अगोदरच पाचवी व आठवीच्या प्रत्येकी ३० ऑनलाइन चाचणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यापासून सर्व अभ्यासक्रमावर आधारित चाचणीही घेण्यात येणार आहे.

राज्य गुणवत्तायादीत अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी स्थान मिळवतील या उद्देशाने शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाचे मासिक व वार्षिक नियोजन केले आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर १० स्वतंत्र चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यामुळे निश्चितच यावेळी राज्य गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थी स्थान मिळवतील, असा विश्वास वाटतो.-भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :examपरीक्षाScholarshipशिष्यवृत्ती