शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’मध्ये नगरकरांनी गुंतवले दोनशे कोटी : हजारो जणांची फसवणूक

By अरुण वाघमोडे | Updated: December 4, 2018 12:22 IST

राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़ गेल्या सहा दिवसांत दहा हजार गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरून या गुंतवणुकीची व्यापकता समोर आली आहे़मैत्रेय ग्रुपच्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील २६ हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी एजंटांमार्फत पैसे गुंतविले आहेत़ यातील कुणाचेच पैसे परत मिळाले नाही़ अखेर १९ एप्रिल २०१८ रोजी या कंपनीत एजंट म्हणून काम करणारे सतीश पुंडलिक पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून कंपनी समूहाच्या चेअरमन वर्षा सप्ताळकरसह संचालकांवर गुन्हा दाखल झाला़ हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेला आहे़ मैत्रेय ग्रुपमध्ये पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांनी आपले कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन सात दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले होते़ या आवाहनानंतर सहा दिवसांतच दहा हजार गुंतवणूकदारांनी कागदपत्र सादर केले आहेत़ यामध्ये अनेकांनी लाखो रूपयांची गुंतवणूक या कंपनीत केली आहे़कंपनीच्या ३०८मालमत्ता जप्तमैत्रेय ग्रुपविरोधात राज्यात विविध जिल्ह्यात ३० गुन्हे दाखल आहेत़ या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी मैत्रेय ग्रुपच्या आतापर्यंत राज्यातील ३०८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत़असे दाखविले आमिष१९९९ मध्ये मधुसूदन सत्पाळकर यांनी नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून मैत्रेय कंपनी स्थापन केली. मधुसूदन यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी वर्षा सत्पाळकर यांनी या कंपनीचा आणखी विस्तार केला़ गुंतवणूकदारांना सुवर्ण सिद्धी योजनेतून ३०० रुपयाच्या बदल्यात पाच वर्षांत ४० हजार आणि भूखंड देण्याचे आमिष दाखवले. तसेच आऱडी एफ डी व चिटफंड या माध्यमातून सर्वसामान्यांनी गुंतविलेले पैसे कंपनीने विविध व्यवसायात गुंतविले.

जिल्ह्यातून मैत्रेय गु्रपमध्ये एकूण किती जणांनी पैशांची गुंतवणूक केली आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दररोज गुंतवणूकदार कागदपत्र घेऊन येत आहेत. ही सर्व माहिती संकलित करून गृहविभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेतले जातील.- प्रवीण भोसले, तपासी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस