शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘मैत्रेय’मध्ये नगरकरांनी गुंतवले दोनशे कोटी : हजारो जणांची फसवणूक

By अरुण वाघमोडे | Updated: December 4, 2018 12:22 IST

राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़ गेल्या सहा दिवसांत दहा हजार गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरून या गुंतवणुकीची व्यापकता समोर आली आहे़मैत्रेय ग्रुपच्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील २६ हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी एजंटांमार्फत पैसे गुंतविले आहेत़ यातील कुणाचेच पैसे परत मिळाले नाही़ अखेर १९ एप्रिल २०१८ रोजी या कंपनीत एजंट म्हणून काम करणारे सतीश पुंडलिक पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून कंपनी समूहाच्या चेअरमन वर्षा सप्ताळकरसह संचालकांवर गुन्हा दाखल झाला़ हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेला आहे़ मैत्रेय ग्रुपमध्ये पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांनी आपले कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन सात दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले होते़ या आवाहनानंतर सहा दिवसांतच दहा हजार गुंतवणूकदारांनी कागदपत्र सादर केले आहेत़ यामध्ये अनेकांनी लाखो रूपयांची गुंतवणूक या कंपनीत केली आहे़कंपनीच्या ३०८मालमत्ता जप्तमैत्रेय ग्रुपविरोधात राज्यात विविध जिल्ह्यात ३० गुन्हे दाखल आहेत़ या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी मैत्रेय ग्रुपच्या आतापर्यंत राज्यातील ३०८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत़असे दाखविले आमिष१९९९ मध्ये मधुसूदन सत्पाळकर यांनी नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून मैत्रेय कंपनी स्थापन केली. मधुसूदन यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी वर्षा सत्पाळकर यांनी या कंपनीचा आणखी विस्तार केला़ गुंतवणूकदारांना सुवर्ण सिद्धी योजनेतून ३०० रुपयाच्या बदल्यात पाच वर्षांत ४० हजार आणि भूखंड देण्याचे आमिष दाखवले. तसेच आऱडी एफ डी व चिटफंड या माध्यमातून सर्वसामान्यांनी गुंतविलेले पैसे कंपनीने विविध व्यवसायात गुंतविले.

जिल्ह्यातून मैत्रेय गु्रपमध्ये एकूण किती जणांनी पैशांची गुंतवणूक केली आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दररोज गुंतवणूकदार कागदपत्र घेऊन येत आहेत. ही सर्व माहिती संकलित करून गृहविभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेतले जातील.- प्रवीण भोसले, तपासी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस