शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संचालकांवर २०० कोटींची जबाबदारी

By admin | Updated: September 4, 2016 00:04 IST

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकारी संस्थांच्या बेलगाम कारभाराला लगाम लावीत पतसंस्था व बँकांची आर्थिक स्वच्छता सुरू केली

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगरसहकार खात्यातील कागदांचा केरकचरा काढून प्रशासकीय स्वच्छता केल्यानंतर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकारी संस्थांच्या बेलगाम कारभाराला लगाम लावीत पतसंस्था व बँकांची आर्थिक स्वच्छता सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या १४५० संचालकांवर २०० कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान सहकार पंढरी असलेल्या नगर जिल्ह्यातही घोटाळेबाज संस्थांभोवती चौकशीचा फास आवळण्यात येत आहे. सहकारी पतसंस्था, सहकारी बँकांसह विविध सहकारी संस्थांमधील आर्थिक बेशिस्त, घोटाळे, गैरव्यवहार यांना चाप लावून या संस्थांमधील पैशांची उधळपट्टी करणाऱ्या संचालकांविरूद्ध कारवाई हाती घेण्यात आली आहे. एखाद्या सहकारी संस्थेविषयी तक्रारी आल्यास, लेखापरीक्षणात दोष दिसून आल्यास त्यांची महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ नुसार चौकशी केली जाते. तर या तपासणीत अपहार, गैरव्यवहार दिसून आल्यास त्याची जबाबदारी कलम ८८ नुसार निश्चित केली जाते. ८३ नुसार २६० संस्थांची चौकशी करण्यात आली आहे. तर ८८ नुसार २५० प्रकरणांची चौकशी सुरू आहे. कलम ८८ नुसार राज्यातील सहकारी पतसंस्था व सहकारी बँकांमधील १४५० संचालकांवर २०० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सहकार आयुक्त दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कलम ८३ नुसार वर्धमान बिगरशेती पतसंस्था वाकडी (राहाता), मोहिनीराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्था नेवासा, अश्वमेध बिगरशेती पतसंस्था वडझिरे (पारनेर), मार्तंड नागरी पतसंस्था (नगर), सह्याद्री नागरी पतसंस्था (नगर),रावसाहेब देशमुख बिगरशेती राशीन (कर्जत), समर्थ हरिदासबाबा बिगरशेती (सुपा) यांची चौकशी करण्यात आली. वर्धमान व मार्तंडची चौकशी पूर्ण झाली. तर कलम ८८ नुसार नगरमधील रावसाहेब पटवर्धन,रामकृष्ण अर्बन क्रेडिट, चंद्रमा नागरी, राशीनची पार्श्वनाथ व नम्रता, सुप्याची समर्थ हरिदास बाबा पतसंस्थेची चौकशी सुरू आहे. चांदा येथील वरदान पतसंस्थेची चौकशी पूर्ण झाली आहे. -अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.आर्थिक संस्थांबाबत सहकारी खात्याकडे तक्रारी आल्यास त्याची वेगाने चौकशी करून वस्तुस्थिती तपासून संस्थेची प्रतिमा डागाळणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. संस्थेची बाजू अगोदर ऐकून घेऊन तक्रारीत अथवा तपासणीत तथ्य आढळले तरच पुढील कारवाई करण्यात येते. तक्रारीत तथ्य नसल्यास ती तत्काळ निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.-चंद्रकांत दळवी, सहकार आयुक्त, पुणे.